शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

आमचे सरकार आल्यास एमएसपी कायदा बनवू, जातीनिहाय जनगणना करू: अलका लांबा

By स. सो. खंडाळकर | Updated: March 13, 2024 16:02 IST

महागाई व बेरोजगारीही कमी करण्याचेही दिले आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा लागू करू, जातीनिहाय जनगणना करू तसेच महागाई व बेरोजगारीही कमी करू, असे आश्वासन अ. भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी मंगळवारी येथे दिले.

त्या गांधी भवनात महिला मेळाव्यात व नंतर पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांच्यासमवेत प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे होत्या. राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यानंतर २२ राज्यांचा व ३० शहरांचा दौरा करून त्या छत्रपती संभाजीनगरात आल्या होत्या. येथूनच त्या दुपारी धुळ्याकडे रवाना झाल्या. आज, बुधवार, दि. १३ मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा धुळ्यात- महाराष्ट्रात प्रवेश करीत आहेत. या यात्रेचे त्या तिथे स्वागत करतील.

दहा वर्षे झाली सत्ता भोगताय, मग आताच सीएए लागू करण्याची गरज का पडली?, मतांच्या ध्रुवीकरणासाठी व ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप लांबा यांनी केला. वीस लाख लोक देश सोडून गेले त्याचे काय असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, लोकसभेत चारशे जागा यांना कशाला पाहिजेत? संविधान बदलण्यासाठी? यासाठी पाशवी बहुमत हवे असेल तर काँग्रेस तसे होऊ देणार नाही.

भाजप सरकारच्या महिला आरक्षण धोरणावर अलका लांबा यांनी टीका केली. केवळ गाजावाजा करून महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले. परंतु, हा एक चुनावी जुमला होता, हे आता लक्षात येतंय. काँग्रेसचे सरकार आल्यास महिला आरक्षण तत्काळ लागू केले जाईल व ओबीसी महिलांनाही आरक्षण दिले जाईल. देशातील यापुढील सरकार इंडिया आघाडीचे राहणार असून, असा ठाम विश्वास लांबा यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा दीपाली मिसाळ, विद्या पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद