शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
3
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
4
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
5
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
6
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
7
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
8
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
9
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
10
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
11
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
12
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
13
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
14
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
15
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
16
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
17
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
18
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
19
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
20
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...

आमचे सरकार आल्यास एमएसपी कायदा बनवू, जातीनिहाय जनगणना करू: अलका लांबा

By स. सो. खंडाळकर | Published: March 13, 2024 4:02 PM

महागाई व बेरोजगारीही कमी करण्याचेही दिले आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा लागू करू, जातीनिहाय जनगणना करू तसेच महागाई व बेरोजगारीही कमी करू, असे आश्वासन अ. भा. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी मंगळवारी येथे दिले.

त्या गांधी भवनात महिला मेळाव्यात व नंतर पत्रकारांशी बोलत होत्या. त्यांच्यासमवेत प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे होत्या. राष्ट्रीय अध्यक्षा झाल्यानंतर २२ राज्यांचा व ३० शहरांचा दौरा करून त्या छत्रपती संभाजीनगरात आल्या होत्या. येथूनच त्या दुपारी धुळ्याकडे रवाना झाल्या. आज, बुधवार, दि. १३ मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा धुळ्यात- महाराष्ट्रात प्रवेश करीत आहेत. या यात्रेचे त्या तिथे स्वागत करतील.

दहा वर्षे झाली सत्ता भोगताय, मग आताच सीएए लागू करण्याची गरज का पडली?, मतांच्या ध्रुवीकरणासाठी व ज्वलंत प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्याचा हा डाव असल्याचा आरोप लांबा यांनी केला. वीस लाख लोक देश सोडून गेले त्याचे काय असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केले की, लोकसभेत चारशे जागा यांना कशाला पाहिजेत? संविधान बदलण्यासाठी? यासाठी पाशवी बहुमत हवे असेल तर काँग्रेस तसे होऊ देणार नाही.

भाजप सरकारच्या महिला आरक्षण धोरणावर अलका लांबा यांनी टीका केली. केवळ गाजावाजा करून महिला आरक्षण विधेयक मंजूर करून घेतले. परंतु, हा एक चुनावी जुमला होता, हे आता लक्षात येतंय. काँग्रेसचे सरकार आल्यास महिला आरक्षण तत्काळ लागू केले जाईल व ओबीसी महिलांनाही आरक्षण दिले जाईल. देशातील यापुढील सरकार इंडिया आघाडीचे राहणार असून, असा ठाम विश्वास लांबा यांनी व्यक्त केला. पत्रपरिषदेस, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहराध्यक्ष शेख युसुफ, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा दीपाली मिसाळ, विद्या पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबाद