शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

'सगेसोयरे' भेसळ तर ५० टक्क्यांच्यावर गेलेल दोन टक्के आरक्षणही भेसळच: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2024 13:49 IST

प्रकाश आंबेडकरांनी आरक्षणावर सर्व समाजासाठी सारखी मांडणी करावी: मनोज जरांगे 

- पवन पवार

वडीगोद्री ( जालना) :प्रकाश आंबेडकर साहेबांनी सगळीकडून आरक्षण संदर्भात सारखी मांडणी करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्यांना काही मी उत्तर देणार नाही, कधी दिलं पण नाही. ते  स्पष्ट बोलतात, खर आहे ते बोलतात त्यामूळे सगळ्या जाती धर्मातले लोक त्यांना मानतात. यामुळे सगळ्यांची सारखी बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे ही जनतेची अपेक्षा आहे. माझीही जास्त अपेक्षा आहे. त्यांनी जनतेची बाजू मांडणे गरजेच आहे. ते म्हणतात सगेसोयरे भेसळ आहे तर मग ५० टक्क्यांवर गेलेले २ टक्के आरक्षणही भेसळ असेल, असे म्हणायला पाहिजे म्हणजे. त्यानंतर ते सर्व जनतेची समान बाजू घेऊन बोलतात हे सिद्ध होईल, असे भूमिका मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी मांडली. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे मंगळवारी सायंकाळी माध्यमांसोबत संवाद साधला.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर साहेबांनी वापरलेला भेसळ ऐवजी बोगस शब्द वापरू. मंत्र्यांनी न्यायाधीशांनी आणि कायद्याच्या अभ्यासकांनी मिळून ठरवलेली आहे आणि ती पक्की आहे आणि टिकणार सुद्धा त्याच्यात सगळ्या जाती-धर्मांना न्याय मिळणार आहे ते जर भेसळ असेल ,तर 50% च्या वर दोन टक्के दिलेल आहे हेही भेसळच असणार. लोकांच्या मनात बसले होते की ते खरं आणि स्पष्ट बोलतात. गोरगरिबांच्या बाजूने बोलतात. माझी वैयक्तिक इच्छा आहे, आम्ही सगळे त्यांना मानतोय, त्यांनी चौफेर सत्य बोलावं. त्यांच्या इतका अभ्यास मला वाटतं कोणाचाही नसणार आहे. मला तरी वाटतं ते अभ्यासपूर्ण असल्याशिवाय बोलत नाही. मला आलेले चार-पाच अनुभव आहे. त्यांच्याबद्दल असलेला सन्मान कायम राहणार आहे, फक्त त्यांनी इथून. मागे जसे कायम समान शब्दावर बोलत होते तेच बोलव. सगेसोयऱ्याबद्दलचं जे त्यांचं बोलणं आहे तेच बोलणं ५० टक्क्यांच्यावर गेलेल्या दोन टक्के आरक्षणाच्या बद्दलही असलं पाहिजे, असेही जरांगे म्हणाले.

जास्तीच्या जागा कोठून आल्या जे १६ टक्के आरक्षण दिलं ते मंडल कमिशनला सोडून दिले. १८० जाती आरक्षणात होत्या आता साडेतीनशे-चारशे जाती झाल्या, त्याही भेसळ असतील मग घातलेल्या त्याच्यावरही आंबेडकर साहेबांनी बोलायला पाहिजे एक्सट्रा जाती कुठून आल्या. जास्तीचे जे आरक्षण घेतले ते पण उडायला पाहिजे ना मग.  वरच दोन टक्के आरक्षण जायला पाहिजे ५० टक्क्यांच्या आतच आरक्षण मर्यादा राहायला पाहिजे. बोगस आरक्षण जे छगन भुजबळ घेत आहेत ते पण जायला पाहिजे ना. त्याच्यावर त्यांनी संविधानाला धरून बोलणं अपेक्षित आहे कारण ते न्याय सारखा करतात हा आमचा तरी समज आहे. त्यांना मी कायम मानतो पुढेही मानत राहणार आहे. मराठा समाज संपवावा किंवा त्यांना आरक्षण मिळू नये याबाबतीचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये.त्यांच्याकडून सगळ्यांना सारखं बोलण्यात यावं, असे आवाहनही जरांगे यांनी यावेळी प्रकाश आंबेडकर यांना केले. 

यात श्रीमंत मराठ्यांचा डावगरीब मराठ्यांना आरक्षण न देण्यास श्रीमंत मराठ्यांचा डाव आहे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते, यावर जरांगे म्हणाले की, आम्ही पण तेच म्हणतो ना. ही गरिबांची लढाई आहे. गरीब मराठ्यांचे लेकर मोठे व्हावे हे ७० वर्षांत कोणत्याच पक्षातल्या नेत्यांना वाटलं नाही. श्रीमंत मराठा म्हणण्यापेक्षा जे सत्ताधारी होते जे राजकारणात होते यांच्या मनात गोरगरिबांना मोठे होऊ देऊ हे नव्हतं. म्हणून तर मी गरीब आहे, माझा समाज गरीब आहे. आम्ही गरिबांनीच ही लढाई उभा केली. श्रीमंत आपल्याला कधीच मोठं करणार नाही. म्हणून आमची लढाई आम्ही उभी केली आणि जिंकत आणली.

आरक्षण बचाव यात्राप्रकाश आंबेडकर यांनी काय करावे हे आम्ही कसं सांगू शकणार नाही. यात्रा काढा किंवा नका काढू मी मात्र माझ्या गरीब मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेणार म्हणजे घेणारच, असा जरांगे यांनी ठाम निश्चय व्यक्त केला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालनाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर