शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल तर दुसऱ्या पत्नीस पेन्शनचा हक्क नाही 

By प्रभुदास पाटोळे | Updated: April 8, 2024 13:55 IST

हिंदू विवाह कायद्यानुसार पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर-खंडपीठाचा निर्वाळा

छत्रपती संभाजीनगर : पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल तर दुसऱ्या पत्नीस कौटुंबिक निवृत्तिवेतनाचा हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. आर. एम. जोशी यांनी दिला. त्याचप्रमाणे हिंदू विवाह कायद्याच्या कलम ११नुसार पहिली पत्नी जिवंत असताना व पहिले लग्न कायदेशीररीत्या संपुष्टात आले नसेल, तर दुसरे लग्न करणे बेकायदेशीर असल्याचे खंडपीठाने निकालात नमूद केले आहे.

लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामधील इस्लामपूर येथील ग्यानबाई देवीदासराव कोंडगीर यांचे लग्न १९७५ साली देवीदासराव कोंडगीर यांच्यासोबत झाले होते. या विवाहातून त्यांना एक मुलगा झाला होता. देवीदासराव अहमदपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयात सर्वेअर होते. १७ मार्च २०२२ रोजी त्यांचे निधन झाले.

पहिली पत्नी ग्यानबाई जिवंत असताना व पहिले लग्न संपुष्टात आले नसताना देवीदासराव यांनी शोभाबाईसोबत बेकायदेशीरपणे दुसरे लग्न केले होते. देवीदासराव यांनी पोटगीच्या प्रकरणात याचिकाकर्ती ग्यानबाई ही त्यांची एकमेव पत्नी असल्याचे मान्य केले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी दुसरे लग्न केले नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. खंडपीठाने दुसरी पत्नी शोभाबाई यांचा मृत देवीदासराव यांच्यासोबत विवाह झाला असल्याचे कथन पुराव्याअभावी फेटाळले होते. पहिली पत्नी ग्यानबाईलाच कौटुंबिक निवृत्तिवेतन मिळण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला. सदर याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे संदर्भ दिले आहेत. याचिकाकर्तीतर्फे ॲड. बालाजी बी. येणगे यांनी, तर शासनातर्फे सहायक सरकारी वकील पवन के. लखोटिया यांनी काम पाहिले.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCourtन्यायालयAurangabadऔरंगाबादlaturलातूर