शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

अवैध बांधकामांचा विळखा

By admin | Published: September 09, 2015 12:12 AM

जालना : शहरात गत काही वर्षांपासून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यामुळे शहराची अवस्था बकाल होत आहे.

जालना : शहरात गत काही वर्षांपासून अनधिकृत बांधकाम व अतिक्रमणांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणाच्या विळख्यामुळे शहराची अवस्था बकाल होत आहे. विशेष म्हणजे पालिकेतील नोंदीनुसार केवळ ६५ अनधिकृत बांधकाम असल्याचे दिसून येते. मात्र, शहरात प्रत्यक्ष पाहणी केल्यास नोंद अगदीच किरकोळ असल्याचे दिसून येते.शहराचा विस्तार काही वर्षांपासून वाढत आहे. अनेक नागरिकांनी बाँड तसेच करारावर घरे बांधली आहेत. नवीन तसेच जुना जालना भागात काहींनी मात्र अनधिकृत बांधकामे करीत नियम धाब्यावर बसविले आहेत. २०१४ मध्ये ५६ अनधिकृत बांधकामे तर २०१५ मध्ये अनधिकृत बांधकामांची पालिकेकडे नोंद आहे. मात्र शहराचा विस्तार पाहता ही नोंद असून, नसल्यासारखीच आहे. अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही संघटनांसह नागरिकांनी केला आहे. शहरातील प्रत्येक प्रभाग तसेच मुख्य रस्त्यांवर अनधिकृत बांधकामासोबतच अतिक्रमणे वाढली आहेत. दरम्यान, काही ठिकाणी पालिकेकडूनच अशा बांधकामांना अभय मिळत असल्याचे चित्र आहे. वर्षभरात पालिका ६५ अनधिकृत बांधकामे सांगत असली तरी मुळात अशी बांधकामे हजारोंच्या संख्येत असल्याची माहिती आहे. अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांमुळे रस्ते अरुंद होण्यासोबतच पालिकेच्या जागाही काही ठिकाणी गिळंकृत होत आहेत. (प्रतिनिधी)शहरातील काही भागात नियमानुसार रजिस्ट्रीच होत नाही. त्यामुळे तेथील रहिवाशांकडे मालमत्तापत्रक नाही. असे असले तरी शहरात शेकडो घरे उभी आहेत. रजिस्ट्रीच होत नाही तर पालिकेने बांधकाम परवानगी कोणत्या मुद्यावर दिली, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. कारवाई सुरूच४नगर पालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, अनधिकृत बांधकाम प्रकरणी अनेकांना स्वच्छता निरीक्षकांमार्फत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकामे काढण्यासाठी पालिकेकडून वेळावेळी कारवाई करण्यात येते. अतिक्रमण काढण्यासाठी लवकरच मोहीम राबविण्यात येणार आहे.