शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

शासनाचे काम संपले नाही! कोरोनामुळे पालक गमावलेली ‘ती’ २७ बालके आहेत सुखासमाधानात

By विजय सरवदे | Published: September 27, 2022 7:50 PM

जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून नियमित संपर्क ठेवण्यात येत आहे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाने पालक गमावलेल्या जिल्ह्यातील २७ बालकांपैकी तिघेजण सध्या शासकीय संस्थेत आहेत, तर २४ जणांचा सांभाळ नातेवाईक करीत आहेत. त्यामुळे महिला व बालविकास विभाग निर्धास्त झाला आहे, असे नाही. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी नियमितपणे या बालकांच्या संपर्कात असून, त्यांच्या उपजीविकेविषयी विचारपूस करून आधार देत आहेत.

कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची काळजी घेणारे कोणीही नाही. अशा निराधार बालकांचे शोषण होऊ नये, ती बालके बालकामगार, बालभिक्षेकरी किंवा मुलांची तस्करी यासारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स तयार करण्यात आला. अशा बालकांचा शोध घेतला तेव्हा जिल्ह्यात २७ बालके आढळून आली. यापैकी २४ बालकांचा सांभाळ करण्याचा विश्वास जवळच्या नातेवाईकांनी दिला, तर ३ बालकांचा सांभाळ करण्यास कोणीही नसल्यामुळे महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाने त्यांची व्यवस्था शासकीय संस्थेत केली आहे. एवढेच नाही, तर केंद्र सरकारचे १० लाख व राज्य सरकारचे ५ लाख या २७ बालकांच्या नावावर बँकेत ठेव जमा केली आहे.

काही मुलांना नातेवाईक सांभाळतात, काही शासकीय संस्थेत आहेत. त्यांच्या नावावर शासनाने ठेवी जमा केल्या. त्यामुळे शासकीय यंत्रणा निर्धास्त झाली, असे नव्हे. या मुलांचे व्यवस्थित पालनपोषण होते का, ती व्यवस्थित शिकतात का, त्यांच्यात कोणताही न्यूनगंड निर्माण होत नाही, या सर्व बारकाव्यांविषयी बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी सातत्याने या बालकांच्या संपर्कात आहेत. ही बालके सध्या सुस्थितीत असल्याचे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद