शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
2
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
3
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
4
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
5
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
6
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
7
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
8
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
9
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
10
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
11
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
12
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
13
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
14
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
15
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
16
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
17
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
18
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
19
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!
20
Pitru Paksha 2024: बेपत्ता होऊन अनेक वर्षं घरी न परतलेल्या व्यक्तीचेही श्राद्ध घातले जाते का? वाचा!

फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटो बायोग्राफी छत्रपती संभाजीनगरात

By प्रशांत तेलवाडकर | Published: August 09, 2024 7:33 PM

फाशी, तोफेने उडविलेले देशातील १०० क्रांतिवीरांची फोटोबायोग्राफी; देशातील एकमेव ‘भारतमाता मंदिर’ छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : ‘‘कशास आई भिजिवसी डोळे, उजळ तुझेभाळ,रात्रीच्या गर्भात उद्याचा, असे उष:काल

सरणावरती आज आमुची, पेटताच प्रेतेउठतील या ज्वाळातून, भावी क्रांतीचे नेते

लोहदंड तव पायामधले, खळाखळा तुटणार आईखळाखळा तुटणार, गर्जा जयजयकार क्रांतीचा’’

भारतमातेला इंग्रजांच्या तावडीतून सोडविण्यासाठी ज्या क्रांतिवीरांनी आपले बलिदान दिले. त्यांची शौर्य गाथा अशा वरील शब्दांत ‘भारतामाता मंदिरात लिहून ठेवली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी फाशावर चढले, त्यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले अशा देशातील निवडक १०० क्रांतिवीरांचे फोटो व माहिती असणारे हे ‘क्रांतिवीरांचे मंदिर’ (भारतमाता मंदिर) देशातील एकमेव ठरत आहे. मात्र, योग्य प्रचार-प्रसार होत नसल्याने याची माहिती पर्यटक सोडा शहरातील सर्व नागरिकांपर्यंतही पोहोचली नाही.

क्रांतिवीर राणी चन्नमा ते राजेंद्र लाहिरीपर्यंतभारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा कुणी केला असेल तर त्या राणी चन्नमाने. १८२४ला कनार्टकातील कित्तूरचे संस्थान इंग्रजांनी ताब्यात घेताच. त्याविरुद्ध पुरुषवेश परिधान करुन, इंग्रजांवर तुटून पडणाऱ्या या महान राणीने शेकडो इंग्रजांना कंठस्नान घातले. त्यांना दि. ३ डिसेंबर १८२४ इंग्रजांनी शिक्षा देत तोफेच्या तोंडी दिले. या पहिल्या फोटोपासून ते राजेंद्र लाहिरी ते रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिसंघटनेत होते. त्यांनी अनेक क्रांतियोजना यशस्वी केल्या. त्यांना दि. १७ डिसेंबर १९२४ रोजी गोंडा येथे फाशी देण्यात आली. या १०० वर्षांतील १०० क्रांतिकारकांच्या फोटोसह माहिती ‘भारतमाता मंदिर’मध्ये बघण्यास मिळते. येथे भारतमातेची मोठी मूर्ती सर्वांचे लक्षवेधून घेते.

प्रत्येक शहरवासीयांनी ‘प्रचारक’ बनण्याची गरजस्वातंत्र्याला ५० वर्षेपूर्ण झाल्याबद्दल महानगरपालिकेच्या वतीने भारतमाता मंदिर उभारण्यात आले. या मंदिराला. येत्या डिसेंबर महिन्यात २५व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या मंदिराची मूळ संकल्पना माजी नगरसेवक संजय जोशी यांची. त्यांनी वर्षभर तिहार जेल, येरवडा जेल व नागपूर जेलमध्ये जाऊन तिथून क्रांतिवीरांचे फोटो जमा केले व विविध ऐतिहासिक पुस्तक वाचून त्यातून माहिती मिळविली. दरवर्षी १४ ते १५ हजार लोक या मंदिराला भेट देतात. भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या वाढविण्यासाठी प्रत्येक शहरवासीयाने पहिले हे भारतमाता मंदिर बघावे त्यांतर त्याचा प्रचार-प्रसार करावा, असे आवाहन संजय जोशी यांनी केले.

शहरावासीयांनी काय करायला पाहिजे?१) भारतमाता मंदिरात शहरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांची सहल घेऊन यावी.२) बाहेरील शाळांच्या सहली येथे येतील यासाठी प्रयत्न करावे.३) एमटीडीसीने देश-विदेशांतील पर्यटकांच्या नियोजनात या भारतमाता मंदिराचा समावेश करावा.४) शहरातील सामाजिक संस्था, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिकांच्या गटाने मंदिराला भेट द्यावी.५) शहरावासीयांनी आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना आवर्जून हे मंदिर दाखवावे.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका