शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
2
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
3
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
4
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
5
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
6
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
7
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
8
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
9
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
10
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
11
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?
12
श्रेयस अय्यर आणि त्याच्या आईची मुंबईत नवीन खरेदी; अपार्टमेंटची किंमत ऐकून बसेल धक्का
13
१० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? 
14
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
15
ही आहेत चार प्रभावशाली कुटुंब, ज्यांच्याकडे आहे तिरुपतीच्या पूजेची जबाबदारी, एवढं मिळतं मानधन, आहे कोट्यवधीची संपत्ती
16
Telegram सीईओ Pavel Durov दबावाला बळी पडले? IP Address, नंबर शेअर करणार!
17
तिरुपती लाडू वाद: मंदिरात सफाई, देवाची माफी मागणार; पवन कल्याण करणार ११ दिवस प्रायश्चित्त
18
“विरोधकांनी राजकारण करायची गरज नाही”; अक्षय शिंदे एन्काउंटरवर रामदास आठवले थेट बोलले
19
धक्कादायक! ॲमेझॉन जंगलात अंदाधुंद वृक्षतोड; दोन देशांच्या क्षेत्रफळाइतके जंगल साफ...
20
Akshay Kumar : "आवाज केला असता तर गोळ्या घातल्या असत्या"; अक्षय कुमारने सांगितला चंबळचा थरारक अनुभव

लोकसभेच्या ७ मतदारसंघांमध्ये मी किंगमेकरच्या भूमिकेत; शांतीगिरी महाराजांचे सूचक विधान

By स. सो. खंडाळकर | Published: December 26, 2022 7:23 PM

या सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती.

- स. सो. खंडाळकरऔरंगाबाद : नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, धुळे, जळगाव, दिंडोरी, जालना या लोकसभा मतदारसंघांत जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या प्रमाणावर असून या मतदारसंघात आपण किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याची सूचक प्रतिक्रिया या परिवाराचे प्रमुख स्वामी शांतीगिरी महाराज यांनी गुरुवारी व्यक्त केली.

वेरुळच्या आश्रमात या प्रतिनिधीने शांतीगिरी महाराजांची भेट घेतली. यावेळी शांतीगिरी महाराजांचे उत्तराधिकारी रामानंद स्वामी महाराज हेही उपस्थित होते. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात उभे राहून शांतीगिरी महाराजांना मिळालेली मते आजही सर्वांच्याच स्मरणात आहेत. तेव्हापासूनच महाराजांचे ‘राजकीय मूल्य’ राजकारण्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांची भेट व्हावी, यासाठी राजकारण्यांमध्ये जणू स्पर्धाच सुरू झाली.

मागच्या वेळेचा पाठिंबा असा होता....मागील लोकसभा निवडणुकीत जय बाबाजी भक्त परिवाराने रावसाहेब दानवे (जालना), हर्षवर्धन जाधव (औरंगाबाद), डॉ. सुभाष भामरे ( धुळे), सदाशिव लोखंडे (शिर्डी), भारती पवार (दिंडोरी), हेमंत गोडसे (नाशिक) या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा दिला होता.

राष्ट्रहित आणि नरेंद्र मोदी यांना समर्थनराष्ट्रहितासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ हा पाठिंबा दिला गेला होता, पण शांतीगिरी महाराजांनी मनात आणले तर ते याच सात लोकसभा मतदासंघांतील राजकीय समीकरण बिघडवू शकतात. आणखी दहा वर्षे तरी नरेंद्र मोदी यांची देशाला गरज असल्याचे त्यांचे मत आहे. किंगमेकरची भूमिका बजावयाची आहे असे म्हणत असताना मतदारांनी त्यांना बिनविरोध संसदेत पाठवावे, अशी महाराजांच्या शिष्यसंप्रदायाची सुप्त इच्छाही लपून राहत नाही.

नरेंद्र मोदी यांची मागेच भेटया सात मतदारसंघांत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींबरोबर ते मागेच नरेंद्र मोदी यांना भेटून आले होते, पण ती सदिच्छा भेट होती. निवडून आलेल्या खासदारांनी शांतीगिरी महाराजांचे आपल्या विजयातील योगदान मोठे असल्याचे सांगितले होते. कसलीही अपेक्षा न ठेवता देशहितासाठी त्यावेळी आम्ही तो निर्णय घेतला होता. परंतु, शांतीगिरी महाराजांना संसदेत येऊ देणं व त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणावर देशसेवा घडू देणंही गरजेचे असल्याचे त्यांच्या शिष्यवृंदांना वाटते. ३१ डिसेंबर रोजी वेरुळच्या आश्रमात अध्यात्म व श्रमदानाच्या निमित्ताने बाबाजींचा शिष्यवृंद एकत्र येणार आहे. त्यावेळी या मुद्यावर चर्चा होऊ शकेल, असे बोलले जाते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारणlok sabhaलोकसभा