शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

शहरात ९, ‘ग्रामीण’मध्ये २४ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 4:05 AM

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या ३३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील ९ तर ग्रामीण भागातील २४ ...

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या ३३ नव्या रुग्णांची भर पडली. यामध्ये शहरातील ९ तर ग्रामीण भागातील २४ रुग्णांचा समावेश आहे. उपचार सुरू असताना पाच रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ६३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील रुग्णसंख्या पुन्हा एकदा एकेरी संख्येत आल्याने दिलासा व्यक्त होत आहे. गेली काही दिवस ग्रामीण भागांत दररोज ५० पेक्षा अधिक रुग्णांचे निदान होत होते. परंतु ग्रामीण भागात आढळणाऱ्या नव्या रुग्णांत शुक्रवारी घट झाली आणि रुग्णसंख्या ५० खाली आली. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४६ हजार ३३४ एवढी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ४२ हजार २७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४ आणि ग्रामीण भागातील ५५ अशा ६९ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना हर्सूल येथील ६० वर्षीय पुरुष, तलवाडा, वैजापूर येथील ८५ वर्षीय महिला, वाकळा, वैजापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, शिरसमाळ येथील २८ पुरुष, इमामपूरवाडी, पैठण येथील ३६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

मोतीलालनगर १, इंदिरानगर १ यासह शहरातील विविध भागांत ७ रुग्ण आढळले.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर १, एमआयडीसी वाळूज १, दरकवाडी १, फुलंब्री १, पैठण १, केऱ्हाळा, केळगाव, सिल्लोड १ यासह विविध गावांमध्ये १८ रुग्ण आढळले.