शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या औरंगाबाद शहराध्यक्षांबद्दल वाढत्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 19:21 IST

विजय साळवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची फारच लवकर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली

ठळक मुद्देशहराध्यक्षांच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह पदाधिकाऱ्यांबाबत कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय साळवे यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक कार्यकर्ते प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असून, त्यांच्याबद्दलच्या तक्रारी वाढल्या आहेत. 

काशीनाथ कोकाटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विजय साळवे हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बनले. यातून राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मराठ्यांचा पक्ष, ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न झाला. विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्षाचे एक नेते कदीर मौलाना यांच्या आग्रहामुळे विजय साळवे यांची ही नियुक्ती झाली. कार्याध्यक्ष म्हणून अभिषेक देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली व दलित-मराठा, असे संतुलन साधण्यात आले. 

विजय साळवे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची फारच लवकर महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली, त्यावेळी प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यांची नियुक्ती झाल्यापासून विशेषत: जुन्या कार्यकर्त्यांमध्ये तिखट प्रतिक्रिया उमटली व त्यांचे राष्ट्रवादी भवनात जाणे कमी झाले. मध्यंतरी राज्याचे अल्संख्याकमंत्री नवाब मलिक हे आले असताना त्यांच्यासमोरच राष्ट्रवादी भवनात माजी शहराध्यक्ष मुश्ताक अहमद यांनी तक्रारींचा पाढा वाचला होता. आम्हाला मान नसेल, तर आम्ही राष्ट्रवादी भवनात का यावे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. 

शुक्रवारी मुश्ताक अहमद म्हणाले, विजय साळवे यांना बदलले पाहिजे, अशी मागणी आम्ही वरपर्यंत अगदी शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत केली आहे. आजही आम्ही या मागणीवर ठाम आहोत व शहराला लवकरात लवकर मुस्लिम शहराध्यक्ष देऊन न्याय दिला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व निष्ठावंत कार्यकर्ते मोतीलाल जगताप म्हणाले, शहराध्यक्ष हे जबाबदारीचे पद असून, विद्यमान अध्यक्ष हे त्याचे भान ठेवून काम करतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. मनपा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सातत्याने राष्ट्रवादी भवनात बैठका, कार्यक्रम होत असतात. इच्छुक उमेदवार, त्यांचे समर्थक यांच्यामुळे राष्ट्रवादी भवनात गर्दी वाढू लागली आहे; परंतु मारहाणीसारखे प्रकार घडत असतील, तर आमच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. त्यामुळे पदाधिकाऱ्यांवरची नाराजी वाढत चालली आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका