शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
3
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
4
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
5
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
7
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
8
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
9
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
10
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
11
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
12
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
13
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
14
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
15
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
16
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
17
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
18
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
19
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
20
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम

पुन्हा अन्याय; मराठवाड्याच्या वाट्याचे पाणी नाशिक विभागात वळविण्याची तयारी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:44 PM

Water Crisis in Marathwada : लॉकडाऊनमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला येणारे पाणी नाशिक विभागात पळविले जाण्याची शक्यता मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य तथा जलतज्ज्ञ शंकर नागरे यांनी वर्तविली.

ठळक मुद्दे दमणगंगेच्या पाण्याचा मुद्दा अजून कागदावरच राज्य शासनाने पाणी प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज नाशिक विभाग साधारण जल उपलब्धी या प्रकारात मराठवाडा विभाग हा अतितुटीच्या प्रकारात येतो.

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी भागाला कोकणातील पाणी देण्याचे सप्टेंबर २०१९ मध्ये जाहीर झाले. ही बाब नाशिककरांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे त्यांनी मराठवाड्यात येणारे कोकणातील पाणी वळविण्याची तयारी सुरू केली आहे. ( Ready to divert Marathwada's share of water to Nashik division?) 

कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये सिंचन योजनेची कामे सुरू करण्यास मुभा दिलेली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला येणारे पाणी नाशिक विभागात पळविले जाण्याची शक्यता मराठवाडा विकास मंडळाचे माजी सदस्य तथा जलतज्ज्ञ शंकर नागरे यांनी वर्तविली. नारपार - गोदावरी योजनेचे ३.४२ अब्ज घनफूट पाणी करंजवन व पुणेगाव योजनेसाठी, दमणगंगा - वैतरणा -गोदावरी या योजनेचे ७.१२ अब्ज घनफूट, तर कदवा धरणाचे सिंचन वाढविण्यासाठी दमणगंगा - एकदरे-गोदावरी योजनेचे ५.०५ अब्ज घनफूट पाणी गंगापूर धरण परिसरात सिंचन वाढविण्यासाठी नाशिक परिसरातच वापरण्याची तयारी सुरू आहे. यावरून मराठवाड्यासाठी प्रस्तावित केलेले १५.६० अब्ज घनफूट पाणी नाशिक विभाग पळविणार आहे, असेच सध्या चित्र आहे. विभागातील लोकप्रतिनिधी व जनतेने याला पायबंद घालण्याची गरज असल्याचे नागरे म्हणाले. वेळीच असे केले नाही, तर उर्ध्व वैतरणा, उल्हास नदी उपखोऱ्यातून येणारे पाणीही मराठवाड्याला मिळण्याबाबत शंका आहे. या प्रकारामुळे मराठवाड्यातील जनतेची दिशाभूल होत असल्याचे चित्र निर्माण होईल. विभागातील लोकप्रतिनिधींनी जागरूक राहून सदरील पाणी नाशिक विभागात वळविले जाणार नाही, यासाठी आतापासूनच सावधान होणे गरजेचे आहे.

...तर हा न्यायालयाचा अवमान होईलजलतज्ज्ञ नागरे यांनी सांगितले, एकात्मिक राज्य जल आराखड्यात दिलेल्या पाणी उपलब्धतेनुसार नाशिक विभाग साधारण जल उपलब्धी या प्रकारात येताे. मराठवाडा विभाग हा अतितुटीच्या प्रकारात येतो. मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार व जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या २०१४च्या आदेशानुसार नाशिक विभागातील गोदावरी खोऱ्यात जायकवाडी धरणाच्यावर पाणी वापराच्या योजना घेण्यास बंदी आहे. तसेच सप्टेंबर २०१६मध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारसुद्धा जायकवाडीवरील नाशिक, अहमदनगर भागात पाणी वापरांच्या योजनांवर निर्बंध घातले आहेत. एवढे निर्बंध असतांना १५.६० अब्ज घनफूट पाणी नाशिक घेत असेल, तर हा न्यायालयाचा अवमान ठरेल.

पश्चिमी वाहिन्यांबाबत अचानक बैठक कशासाठीजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मंगळवारी पश्चिमी वाहिन्यांतील पाणी आणि मराठवाड्यातील पाणीटंचाई व पाहणी याबाबत बैठक झाल्याचे ‘लोकमत’मध्ये वाचले. परंतु अचानक बैठक कशी काय घेतली. पाटबंधारे मंडळातून कुणीही त्या बैठकीसाठी गेलेले नव्हते. त्यामुळे हा काय प्रकार आहे, हे समजण्यास मार्ग नसल्याचे नागरे म्हणाले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीMarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारNashikनाशिक