शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
6
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
7
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
8
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
9
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
10
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
11
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
12
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
13
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
14
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
15
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
16
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
17
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
18
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
19
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
20
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video

नाविन्यपूर्ण उपक्रम! विद्यार्थ्यांनो इनोव्हेशन करा; ५ लाखांपर्यंत भांडवल मिळवा

By राम शिनगारे | Published: August 18, 2023 8:13 PM

इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना नावीन्यता जोपासता येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर : नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागांतर्फे स्टार्टअप धोरण जाहीर झाले आहे. त्यात विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी राज्य नावीन्यपूर्ण सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन केले आहे. यात विद्यार्थ्यांना पाच लाखांपर्यंत बीजभांडवल मिळणार आहे. इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना नावीन्यता जोपासता येणार आहे.

काय आहे इनोव्हेशन चॅलेंजराज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन केले आहे.

३१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्जशैक्षणिक संस्थांसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट असून, विद्यार्थ्यांना अर्जासाठी १५ सप्टेंबर ही तारीख ठेवली आहे.

कोणाला करता येणार अर्जइनोव्हेशन चॅलेंजमध्ये पदवी, पदव्युत्तर, पदविकेचे शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सध्या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त तीन जणांच्या समूहाला सहभाग नोंदवता येईल. तसेच अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे नावीन्यपूर्ण संकल्पना असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करणार?इनोव्हेशन चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवातीला विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या संस्थांनी https://schemes.msins.in या पोर्टलवर नोंदणी करावी. त्यानंतर नोंदणी केलेला संस्थांमधील विद्यार्थ्यांना https://schemes.msins.in या पोर्टलवर नोंदणी करता येईल.

प्रत्येक जिल्ह्यातून १० विजेतेप्रत्येक जिल्ह्यातून १० विजेते निवडले जातील. त्यामध्ये ३० टक्के महिला आणि ५० टक्के विजेते हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून असतील.

सर्वोत्कृष्ट १०० संकल्पना निवडणारजिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांकडून प्राप्त झालेल्या सर्वोत्तम दोन संकल्पनांमधून १०० संकल्पनांची जिल्हास्तरीय सादरीकरणासाठी निवड करण्यात येईल. त्यातून १० जणांची निवड जिल्हास्तरीय विजेत्यांसाठी होईल. जिल्हास्तरावर प्रत्येकी एक लाख, राज्यस्तरावर पाच लाखांचे भांडवल जिल्हास्तरावर निवड झालेल्या १० नवसंकल्पनांसाठी प्रत्येक एक लाख रुपयांचे तर राज्यस्तरावर १० विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बीजभांडवल देण्यात येणार आहे.

संधी हवी शहरातील उमेदवाराप्रमाणेच ग्रामीण भागातील सर्व घटकांतील उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिभा आहे. त्या विद्यार्थ्यांना संधीची आवश्यकता असते. अशी संधी या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. त्याचा लाभ संस्था व उमेदवारांनी घ्यावा.- सुरेश वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद