शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

कारभार स्वच्छ करण्याऐवजी छत्रपती संभाजीनगरातील 'ते' कार्यालय बंद करण्याचा प्रस्ताव

By विकास राऊत | Published: May 29, 2024 12:55 PM

घोटाळ्यांचे माहेरघर असलेले मुद्रांक विभागातील ते कार्यालय बंद करण्याचा सह जिल्हा निबंधकांनी महानिरीक्षकांना पाठविला प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : दोन वर्षांपासून विविध घोटाळ्यांच्या कारनाम्यांचे माहेरघर असलेले जिल्हा मुद्रांक विभागातील ५ क्रमांकाचे कार्यालय बंद करावे, असा प्रस्ताव जिल्हा मुद्रांक निबंधकांनी महानिरीक्षकांना पाठविला आहे.

कारभार स्वच्छ करण्याऐवजी बंद करण्याचा अफलातून प्रस्ताव सध्या प्रशासनात चर्चेचा विषय बनला आहे. नोंदणी विभागाच्या जिल्ह्यातील एकूण १३ कार्यालयांपैकी दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ५ हे वादग्रस्त ठरले. या कार्यालयात प्रभारी पदभारही घेण्यास कोणी तयार होत नसल्याने हे कार्यालयच बंद करावे, असे प्रस्तावात म्हटले. महानिरीक्षकांनी प्रस्ताव मंजूर केल्यास कार्यालय बंद करून तेथील कर्मचारी इतरत्र जातील. कार्यालया अंतर्गत क्षेत्राच्या कामाचेही वर्गीकरण होईल. जिल्ह्यातील १३ पैकी केवळ २ दुय्यम निबंधक हे नियमित आहेत. बाकी ११ कार्यालयांचा पदभार प्रभारी आहे.

का वादग्रस्त झाले कार्यालय?तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन, अब्दीमंडीतील विविध गटांच्या रजिस्ट्री रात्री उशिरापर्यंत कार्यालय सुरू ठेवून करणे, जागेचे मूल्य कमी दाखवून नोंदणी करणे, मुद्रांक शुल्क बुडविणे या व इतर अनेक मुद्द्यांसह कार्यालय क्र. ५ मधून बनावट एनएद्वारे अनेक दस्तांची नोंदणी केल्याच्या तक्रारी विभागीय आयुक्तांकडे गेल्या. त्यांनी २०१९ पासूनच्या सर्वच दस्तांची तपासणी करण्याचे आदेश महसूल आणि नोंदणी विभागाला दिले आहेत. हा सगळा प्रकार पाहता कार्यालयातील कर्मचारी विभागीय चौकशीच्या फेऱ्यात आले.

तीन महिन्यांपूर्वीच राजपूत यांचे निलंबन...अब्दीमंडी शत्रू संपत्तीच्या दस्तांची नोंदणी रात्री उशिरापर्यंत केल्याने दुय्यम निबंधक गणेश राजपूत यांचे निलंबन करण्यात आले. याच कार्यालयात बनावट एनएद्वारे अनेक दस्तांची नोंदणी केल्याच्या तक्रारी आहेत. राजपूत यांच्या निलंबनानंतर या कार्यालयाचा पदभार वरिष्ठ लिपिक मधुकर क्षीरसागर यांच्याकडे दिला. त्यांच्या काळातही २३ कोटी रुपयांची जमीन ९ कोटींना दाखवून दस्त नोंदणी केली. यामध्ये तब्बल ८३ कोटींचा मुद्रांक शुल्क कमी घेतले. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यांच्या प्रभारी कार्यकाळातील संपूर्ण दस्तांची चौकशी करण्याचे निर्देश उपमहानिरीक्षक विजय भालेराव यांनी दिले.

महानिरीक्षकांकडे प्रस्ताव५ क्रमांकाचे कार्यालय बंद करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याने तेथील पदभार घेण्यास कुणीही तयार नाही. मध्यंतरी प्रभारी असलेेले दुय्यम निबंधक मधुकर क्षीरसागर यांनीही चुकीची दस्त नोंदणी केली. त्यांचा पदभार ३१ मे पर्यंत असेल, त्यानंतर काढून घेण्यात येईल. त्यांच्या काळातील दस्तनोंदणीची चौकशी होईल, त्यानंतर कारवाई होईल.-विवेक गांगुर्डे, जिल्हा मुद्रांक अधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग