शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

दलित वस्त्यांच्या कामांचा मुद्दा ऐरणीवरच

By admin | Published: February 16, 2016 11:30 PM

हिंगोली : समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी पंचायत समित्यांना वर्ग करूनही कामांचा पत्ता नाही.

हिंगोली : समाजकल्याण विभागाच्या दलित वस्ती सुधार योजनेचा निधी पंचायत समित्यांना वर्ग करूनही कामांचा पत्ता नाही. पंचायत समितीकडून पत्राचे नाहक भांडवल केले जात असेल तर प्रत्येक काम तेवढ्याच काटेकोरपणे होते काय? हे तपासावे लागेल, असा इशारा जि.प. उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे यांनी दिला.यंदाची दुष्काळी स्थिती पाहता भविष्यात पाणीटंचाईमुळे कामे रखडता कामा नये, ही खूणगाठ बांधून दलित वस्ती सुधार योजनेचे वेळेत नियोजन केले होते. या योजनेत मंजूर असलेला सर्व १९.१४ कोटी रुपयांचा निधी बीडीएसवर प्राप्त झाला आहे. तर संपूर्ण ३१७ दलित वस्त्यांमध्ये कामे करण्यास मंजुरी दिलेली आहे. परंतु ३ लाखांवरील कामांना ई-निविदा काढण्याचा शासन आदेश आल्यानंतर ही कामे ठप्प पडली होती. ही कामे करण्यास इच्छुक असलेल्या ग्रामपंचायतींची अडचण झाली होती. मात्र जुन्या व नव्या शासन निर्णयाचा संदर्भ देत शासनाने मार्गदर्शक सूचना देत सक्षम ग्रामपंचायतींनी मागणी केल्यास त्यांना स्वत: कामे करता येतील, असे पत्र दिले होते. त्याचा आधार घेत पंचायत विभागाने बीडीओंना पत्र दिले. त्यानंतर जनसुविधा योजनेतील कामे सुरू झाली. मात्र हा निकष समाजकल्याणचे काम असल्याने तेथे लागू होत नसल्याचे काही बीडीओ म्हणत आहेत. यात समाजकल्याणचे पत्र लागणार असल्याचे ते म्हणतात. मात्र पूर्वी समाजकल्याणच्या शासन निर्णय ग्रामपंचायतींना लागू होत नाही, ग्रामविकासचाच हवा, अशी भूमिका घेतली गेली होती. या सोयीच्या अर्थ काढण्याच्या पद्धतीमुळे उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे जाम भडकले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत जो निर्णय घ्याचा तो वेळेत घेवून कामे मार्गी लागतील, याची काळजी घेण्याचे भ्रमणध्वनीवरून अधिकाऱ्यांना कळविले. तर समाज कल्याण विभागानेही पत्र देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)