शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

जालना-उस्मानपूर रेल्वे विद्युतीकरण पूर्ण; वेगात सुधारणा, अधिक गाड्या सुरू होण्याची शक्यता

By सुमित डोळे | Published: November 04, 2023 12:52 PM

गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होऊन विभागात आणखी गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात.

छत्रपती संभाजीनगर : डिझेल इंजिनवरून रेल्वे आता इलेक्ट्रिक इंजिनवर येण्याच्या प्रक्रियेने आता वेग धरला असून, जालना-उस्मानपूरदरम्यान ५३ किलोमीटरचे रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे या विभागात एकूण २२७ किलोमीटरचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून उस्मानपूर, परभणी, मुदखेड, धर्माबाददरम्यानच्या विभागांमध्ये लवकरच विद्युतीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्या संपूर्ण रेल्वेमार्ग वीज तारांनी जोडला जात आहे. आवश्यक त्या ठिकाणी रेल्वेचे स्वतंत्र वीज उपकेंद्रही उभारले जात असून, डिसेंबर २०२३ पर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष देण्यात आले आहे. या कामाचे चार टप्पे असून, पहिल्या टप्प्यात उस्मानपूर ते परभणी, परभणी ते पूर्णा, पूर्णा ते नांदेड आणि नांदेड ते मुदखेड या चार टप्प्यांत कामे सुरू आहेत. आतापर्यंत अकोला ते पूर्णा, पिंपळकुटी ते मुदखेड, परळी ते परभणी, अंकाई ते जालना, जालना ते उस्मानपूरदरम्यान विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मनमाड, मुदखेड, ढोणे विद्युतीकरण प्रकल्पाला २०१५-२़१६ मध्ये ७८३ किलोमीटर अंतरासाठी अंदाजे ८६५ कोटी रुपये खर्चाची मंजुरी देण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील प्रकल्पाची लांबी मनमाड, धर्माबाददरम्यान अंदाजे ४२० किमी रेल्वे ट्रॅकचा समावेश आहे.

फायदा काय?रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण ट्रॅक्शन पॉवरमधील बदल टाळून आणि कोचिंग आणि मालवाहू गाड्यांच्या मार्गातील खोळंबा कमी करून रेल्वेची अखंड हालचाल सुरू राहते. परिणामी, गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा होऊन विभागात गाड्या सुरू केल्या जाऊ शकतात. या प्रक्रियेमुळे शून्य कार्बन उत्सर्जन होते; तसेच इंधनाच्या खर्चातही बचत होते.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेtourismपर्यटन