शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ सिल्लोडमध्ये जनआक्रोश मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 5:18 PM

सिल्लोड शहरसह तालुक्यातील ३५ गावात देखील कडकडीत बंद पाळण्यात आला

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सिल्लोड शहरात सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत  कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच शहरातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. तसेच तालुक्यातील गोळेगाव, पानवडोद, अंधारी,उंडणगाव, भराडी सहित तालुक्यातील ३० ते ३५ गावात बंद पाळण्यात आला. सिल्लोड शहर व तालुक्यातील व्यापाऱ्यांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सकल हिंदू समाजाच्यावतीने  आज दुपारी शहरातून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चास सुरुवात झाली. भगवान महावीर चौकात या  मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बांगलादेशमध्ये मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मोर्चात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

काय आहेत मागण्या विदेशी घुसखोरांना देशातून बाहेर काढा, वक्फ बोर्ड बरखास्त करा, गडकिल्यावरील अतिक्रमण काढा, जे राखी बांधत नाहीत त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देऊ नका, मदरसे बंद करा, लव्ह जेहाद, गोहत्या बंदी कायदा लागू करा, भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार रुपेश खंडारे यांना आंदोलकांनी दिले. 

हिंदूंसाठी सीमा उघडामोर्चाला मार्गदर्शन करताना सकल हिंदू समाजाचे सुरेश चव्हाण म्हणाले की, बांगलादेशातील हिंदूवर होणारे अत्याचार थांबवा. भारतात येणाऱ्या बांगलादेशी हिंदूंसाठी सीमा उघडून द्या, विभाजनानंतर पाकिस्तान व बांगलादेश जसे मुस्लिम देश झाले, तसे भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा. तसेच हिंदूंनी एक, दोन अपत्यांवर न थांबता लोकसंख्या  वाढवावी असे आवाहन देखील चव्हाण यांनी यावेळी केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBangladeshबांगलादेश