शहरं
Join us  
Trending Stories
1
वसंत मोरेंची मोठी घोषणा! या तारखेला शिवबंधन बांधणार; वंचित सोडण्याचे कारणही सांगितले...
2
हुतात्मा अग्निवीरांना आर्थिक मदत नाही, राहुल गांधींचा दावा लष्कराने फेटाळला, शहीद अग्निवीराचे वडील म्हणाले...  
3
"अदानीपासून मुंबईला वाचवा, जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची चौकशी करा", विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
4
'वर्ल्ड चॅम्पियन्स' परतले! टीम इंडियाने परतीच्या प्रवासात केली तुफान मजा-मस्ती (VIDEO)
5
वसंत मोरे ठाकरे गटात प्रवेश करणार? संजय राऊतांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...
6
Team India meets PM Modi: 'जगज्जेती' टीम इंडिया PM मोदींना भेटली, दीड तास रंगल्या गप्पा गोष्टी (Video)
7
PHOTOS : मायदेशी परतताच 'चॅम्पियन' विराटने घेतली कुटुंबीयांची भेट; बहिणीने शेअर केली झलक!
8
सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले, अटक करा; एसटी कामगार संघटनेचे आंदोलन
9
Team India ने मोदींची भेट घेतली; पंतप्रधानांच्या एका कृतीने मात्र लक्ष वेधले, वाचा सविस्तर
10
‘या’ ४ पैकी तारखांना झालाय तुमचा जन्म? राहुची कृपा; क्रिएटिव्ह, दूरदर्शी अन् धनवान बनतात
11
Sanjay Raut : "अजित पवारांनी पक्ष बदलला नाही तर आपल्या काकांचा मूळ पक्ष चोरला, त्याबद्दल त्यांना..."
12
ऐश्वर्या राय-श्रीदेवीनं नाकारलेल्या या सिनेमानं रवीना टंडनला बनवलं स्टार, अक्षय कुमार होता मुख्य भूमिकेत
13
₹१४५ वरून ₹५००० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर; १००००० कोटींपार गेलं मार्केट कॅप
14
खासदार बांसुरी स्वराज यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी, NDMC सदस्य म्हणून नियुक्ती! 
15
सलमानच्या 'सिकंदर'मध्ये 'मुंज्या' मधील हा अभिनेता साकारणार खलनायक, सेटवरील फोटो व्हायरल
16
Weight loss Tips: आरोग्य शास्त्रानुसार वजन कमी करण्यासाठी किती पाणी प्यायला हवे? वाचा
17
Credit Score : वेळेवर EMI भरुनही क्रेडिट स्कोअर कमी झाला? वाचा नेमकं कारण काय?
18
MCA ची चाहत्यांना खुशखबर! वानखेडेमध्ये मोफत एन्ट्री; 'चॅम्पियन' संघाला पाहण्याची सुवर्णसंधी
19
विश्वविजेते टीम इंडियाचे ४ मुंबईकर खेळाडू थेट अधिवेशनात; विधिमंडळात होणार सत्कार
20
मुंबई देशातील सर्वात महागडे शहर, तर इस्लामाबाद जगात सर्वात स्वस्त; यादीत अव्वल कोण?

विधानसभा निवडणुकीआधी जुन्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार का? जयंत पाटलांनी थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 5:10 PM

Jayant Patil : विधानसभा निवडणुकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात येणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत.

Jayant Patil ( Marathi News ) : लोकसभेच्या निवडणुका संपल्या. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले तर महायुतीला अपेक्षित जागा जिंकता आल्या नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकाच जागेवर विजय झाला. आता राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान, आता विधासभा निवडणुकीआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत, यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.

मोठी बातमी: ७ जुलैपासून विठ्ठलाचं २४ तास दर्शन; मुख्यमंत्र्यांना दिले आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

जयंत पाटील म्हणाले, जुन्या नेत्यांना परत घेणे आता ही आमची प्रायोरिटी नाही. पण, जे कार्यकर्ते परत येऊ इच्छितात. जे सत्तेत गेलेले नाहीत किंवा ज्यांचा सत्ता मिळवण्यासाठी वापर झालेला आहे. असे काही घटक आहेत. ते वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आहेत. आमच्याकडे नवीन चेहरेही यायला लागले आहेत. तरुण मुलं, तरुण कार्यकर्ते पुढं यायला लागले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघाचा विचार करुन योग्य तो विचार करु, असंही जयंत पाटील म्हणाले. 

"आमच्या पक्षाला मधल्या काळात मोठ्या प्रमाणात त्रास झाला. त्यामुळे जे पक्षासाठी योग्य आहे तोच निर्णय घेऊ, असंही पाटील म्हणाले. फक्त संपर्क करणे, यावर बोलणे योग्य नाही. ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळी यावर बोलेन, असंही पाटील म्हणाले.  

विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. शिवसेनेलाही उद्धव ठाकरे यांच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांना चांगला प्रतिसाद मिळेल, काही दिवसातच जागावाटपावर चर्चा होणार आहे, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. 

महाविकास आघाडीतील कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्रिपदाबाबक भाष्य करणे टाळले पाहिजे

यावेळी बोलताना जयंत पाटील यांना पत्रकारांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी जयंत पाटील म्हणाले, जयंत पाटील किंवा अ , ब, क मुख्यमंत्री याच्यात कुठल्याही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्वारस्य ठेवू नये. आम्ही सत्तेवर आलो पाहिजे हे स्वारस्य पहिले पाहिजे. आज कुठल्याही पक्षाने मुख्यमंत्रिपदाबाबक भाष्य करणे टाळले पाहिजे, असंही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस