शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
2
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
3
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
4
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
5
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
6
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
7
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
8
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
9
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
10
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
11
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
12
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
13
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
14
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
15
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
16
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
17
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
18
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
19
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
20
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात

जरा धूळ झटका फाईलच्या गठ्ठ्यांवरील, महिनाभरात सर्व प्रकरणे निकाली काढा: जिल्हाधिकारी

By विकास राऊत | Published: July 04, 2024 4:22 PM

दप्तर दिरंगाई आता चालणार नाही; एक महिन्यांत सगळी प्रकरणे निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उपविभागीय, तहसीलदार व अन्य अनुषंगिक कार्यालयांमध्ये विविध अर्ज, निवेदने, तक्रारी दप्तर दिरंगाईमुळे प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ३० जुलैपर्यंत सगळ्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश मंगळवारी एका प्रशिक्षणादरम्यान दिले.

शून्य प्रलंबितता अभियान राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय प्रशिक्षणाने या अभियानाची सुरुवात केली. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले, ३० जुलै ही अंतिम तारीख ठरवून त्या तारखेपर्यंतची सर्व पत्र, निवेदने, तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

महिन्याभरात असे करावे लागेल काम३ ते ७ जुलै उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय स्तरावर प्रशिक्षण, ७ ते १७ जुलै प्रत्यक्ष कामकाज, स्वच्छता, छाननी, वर्गवारी, प्रलंबितता शोधमोहीम राबविणे, तक्रार निवारण दिवस २० ते २२ जुलै दरम्यान घेणे, २३ ते २८ जुलै प्रलंबित प्रकरणांची सुनावणी घेऊन निकाली काढणे, २८ ते २९ जुलै सर्व प्रपत्रात माहिती पाठविणे, ३० जुलै शून्य प्रलंबितता घोषित करणे.

जरा धूळ झटका गठ्ठ्यांवरीलदप्तराच्या अद्ययावतीकरणासह सहा गठ्ठा पद्धतीने अभिलेखे लावण्याचे आदेश स्वामी यांनी दिले. दप्तराच्या नोंद वह्या, अभिलेख कक्ष अद्ययावत करावे लागेल. संपूर्ण कार्यालयाची साफसफाई, नस्ती, कागदपत्रे तपासून त्यांचे वर्गीकरण, गठ्ठे, सूची बनवणे, कार्यालय व्यवस्थापन, कार्यालये पर्यावरणपूरक करण्यासाठी प्रयत्न, अभ्यागतांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही कामे राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादRevenue Departmentमहसूल विभाग