शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

पुतण्याच्या वॉर्डातून काकांना अल्प मते, तर महापौरांच्या वॉर्डातही ट्रॅक्टरचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:04 IST

केंद्रनिहाय मतांची गोळाबेरीज ठरणार मारक 

ठळक मुद्दे शिवसेनेला पश्चिम, कन्नड, वैजापूर मतदारसंघांतून मताधिक्य मिळालेशहरातील पूर्व आणि मध्य मतदारसंघात शिवसेनेची प्रचंड पीछेहाट झाली आहे.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागल्यानंतर आता मतदान केंद्रनिहाय विश्लेषण सुरू झाले आहे. माजी खा. चंद्रकांत खैरे यांचा अल्पमतांनी पराभव करीत इम्तियाज जलील यांनी संसदेत मार्ग मिळविला. हा पराभव शिवसेनेच्या प्रचंड जिव्हारी लागला असून, कुणाच्या वॉर्डातून किती मते मिळाली याचा आकडा आता समोर येऊ लागला आहे. माजी खा.खैरे यांचे पुतणे तथा नगरसेवक सचिन खैरे, मुलगा ऋषिकेश खैरे यांच्या वॉर्डातून खा. इम्तियाज जलील, अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना जास्तीची मते मिळाली आहेत. 

सहा मतदारसंघांतील मतदान केंद्रनिहाय आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडून मिळाल्यानंतर त्यातील गोळाबेरीज सुरू झाली आहे. प्रशासनाने मतदान केंद्र क्रमांकनिहाय मतदानाचे आकडे दिल्यामुळे नेमके कोणत्या वॉर्डातील केंद्रावर किती मते शिवसेना, काँग्रेस, एमआयएम, अपक्ष उमेदवाराला मिळाली याचा आढावा घेण्यात येत आहे. सचिन खैरे यांच्या बेगमपुरा वॉर्डातून शिवसेनेला १६०० च्या आसपास, तर अपक्ष उमेदवार जाधव यांना १९०० च्या आसपास मतदान झाले आहे. विशेष म्हणजे एमआयएमला मोठ्या प्रमाणात मतदान मिळाले आहे. शिवसेना नगरसेवक असताना येथे मताधिक्य मिळू शकले नाही. तसेच खैरे यांचे चिरंजीव ऋषिकेश खैरे यांच्या समर्थनगर वॉर्डातूनही शिवसेनेला कमी मतदान झाले आहे. तेथे अपक्ष आणि एमआयएमने बऱ्यापैकी मतदान घेतले आहे. तसेच विद्यानगर वॉर्डातून शिवसेनेला मताधिक्य मिळाले तरी,जवळपास १२०० च्या आसपास मते अपक्ष उमेदवार जाधव यांना मिळाली आहेत. तेथे २२८२ मते शिवसेनेला मिळाली.

सहा विधानसभा मतदारसंघांचा विचार केला, तर शिवसेनेला पश्चिम, कन्नड, वैजापूर मतदारसंघांतून मताधिक्य मिळाले असले तरी ते निर्णायक ठरलेले नाही. शहरातील पूर्व आणि मध्य मतदारसंघात शिवसेनेची प्रचंड पीछेहाट झाली आहे. भाजप नगरसेवक असलेल्या वॉर्डातून शिवसेनेचे मताधिक्य घटले आहे. पूर्व मतदारसंघात शिवसेना, काँग्रेस, अपक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज केली तरी एमआयएम ७२५ मतांनी पुढेच आहे. 

महापौरांच्या वॉर्डात ट्रॅक्टरचा धक्कामहापौर नंदकुमार घोडेले यांच्या वॉर्डातही शिवसेनेला ट्रॅक्टरने धक्का दिला आहे. अपक्ष उमेदवार जाधव व शिवसेनेला बरोबरीचे मतदान झाले आहे.ईटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी या पट्ट्यात अपक्ष उमेदवार जाधव यांना चांगले मतदान झाले आहे. ४४४२ मतांनी खैरेंचा पराभव झाला असल्यामुळे तो जिव्हारी लागण्यासारखा आहे. शिवसेना नगरसेवकांसह खैरे यांच्या नजीकच्या नगरसेवकांंच्या प्रभावाची थोडी जादू चालली असती, तर हा पराभव झाला नसता असे बोलले जात आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Chandrakant Khaireचंद्रकांत खैरेLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालAurangabadऔरंगाबाद