शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
2
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
3
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
4
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
5
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
6
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
7
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
8
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
9
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
10
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
11
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
12
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
13
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
14
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
15
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर
16
केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!
17
Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ
18
१५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?
19
टीम इंडियाची 'विजया दशमी'! दहाव्यांदा प्रतिस्पर्धी संघाला क्लीन स्वीप देत जिंकली मालिका

पावसाअभावी खरीप गेले, आता अवकाळीने रब्बीचे नुकसान; मराठवाड्यात १०७ मंडळात अतिवृष्टी

By विकास राऊत | Published: November 28, 2023 11:33 AM

मराठवाड्यातील २ हजार १४० गावांतील रब्बी पिकांवर अवकाळी संकट

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात रविवारी रात्रीपासून आज पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली. अतिवृष्टीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरत्या वर्षांत कमी पावसामुळे सहा जिल्ह्यांतील तर दोन जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे खरीप पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. रबी हंगामाच्या पेरण्यांचा अंतिम टप्पा असतानाच अवकाळी पावसाने पिकांचे माती केली. विभागातील १०७ मंडळातील सुमारे २ हजार १४० गावांतील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विभागीय प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पंचनाम्यानंतर वस्तुस्थिती समाेर येईल. विभागात सुमारे ८ हजार ५५० गावे असून ४२५ मंडळ आहेत. त्यातील १०७ मंडळे रविवार २६ रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : ६४० गावांत नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३२ मंडळात पावसाने थैमान घातले. ६४० गावांमध्ये रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात उस्मानपुरा ७४ मि.मी., भावसिंगपुरा ८५ मि.मी., कांचनवाडी ७९ मि.मी., चौका ८६ मि.मी., कचनेर ६८ मि.मी., पंढरपूर ७३.७५ मि.मी., अडूळ ९३.५० मि.मी., बिडकीन ६८.२५ मि.मी., पाचोड ६८ मि.मी., मांजरी ६८.२५. मि.मी., भेंडाळा ६९ मि.मी., तुर्काबाद ७८.५० मि.मी., वाळुज ७३.७५ मि.मी., डोणगाव ९९.७५ मि.मी., असेगाव ६७.२५ मि.मी., शिवूर ८७.५० मि.मी., गारज ७६ मि.मी., महालगाव ७०.७५ मि.मी., जानेफळ ६८ मि.मी., कन्नड ६७ मि.मी., चाफानेर ६७ मि.मी., देवगाव ७२.२५ मि.मी., पिशोर ८६.२५ मि.मी., नाचनवेल ७९.५० मि.मी., चिंचोली लिंबाजी ६६.७५ मि.मी., वेरुळ १०७.५० मि.मी., सुलतानपूर १०३.७५ मि.मी., बाजारसावंगी ८६ मि.मी., गोळेगाव ६६.५० मि.मी., आमठाण ७३.२५ मि.मी., बोरगाव ७७.२५ मि.मी. तर फुलंब्रीमध्ये ८९.५० मि.मी. पावसाची नोंद झाली.

जालना : ५४० गावांना अतिवृष्टीचा दणका जालना जिल्ह्यात २७ मंडळांतील ५४० गावांना अवकाळी पावसाचा दणका बसला. त्यात भोकरदन ९५.७५ मि.मी., पिंपळगाव ७२.५० मि.मी., केदरखेडा ७५.७५ मि.मी., जाफ्राबाद ७१.७५ मि.मी., कुंभारजारा ७७.७५ मि.मी., टेंभूर्णी ८०.५० मि.मी., जालना शहर १०४.२५ मि.मी., वाघरुळ १३२.२५ मि.मी., नेर ७६.२५ मि.मी., शेवाळी ८१.५० मि.मी., रामनगर ७८.५० मि.मी., पाचनवड ७८.५० मि.मी., जामखेड ७२.५० मि.मी., रोहिलगड ८१.५० मि.मी., गोंदी ७० मि.मी., वडीगोद्री ७२.७५ मि.मी., वाटूर ६८.७५ मि.मी.,बदनापूर ९३.२५ मि.मी., शेलगाव १३२ मि.मी., बावणे ९२.५० मि.मी., रोशनगाव ९०.५० मि.मी., तिर्थपूरी ९०.२५ मि.मी., कु. पिंपळगाव ७२.५० मि.मी., अंतरवाली ७१.७५ मि.मी., तळणी ७४.२५ मि.मी., ढोकसाळ ७७.२५ मि.मी., पांगरी ८३.५० मि.मी. तर तलवाडा मंडळात ७५.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली.

परभणीत : ४६० गावांना अवकाळीचा फटकापरभणी जिल्ह्यातील २३ मंडळातील ४६० गावांतील रबी हंगामाला अवकाळीचा फटका बसला आहे. त्यात परभणी १०२.५० मि.मी., जांब ७०.७५ मि.मी., झरी ७२ मि.मी., सिंगनापूर ७६.२५ मि.मी., पिंगळी ७६ मि.मी., केसापुरी ७२.५० मि.मी., जिंतूर १२९.७५ मि.मी., संगावी ८४ मि.मी., बामणी ८२ मि.मी., बोरी ८८.७५ मि.मी., अडगाव १०२.७५ मि.मी., चारठाण ७५.५० मि.मी., वाघी १००.७५ मि.मी., दुधगाव ८३.२५ मि.मी., पूर्णा ९७.७५ मि.मी., तडकळस ९१.७५ मि.मी., लिमाळा ६८.२५ मि.मी., कंठेश्वर ७५ मि.मी., चुडावा ९४.५० मि.मी., देऊळगाव ७६.७५ मि.मी., कुपटा ९४.५० मि.मी., कोलहा ७६.७५ मि.मी. तर तडबोरगाव मंडळात ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

हिंगोलीत २४० तर बीडमध्ये २० गावांत नुकसानहिंगोली जिल्ह्यात १२ मंडळातील २४० गावांत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. त्यात हिंगोली ७२.२५ मि.मी., बासंमबा ७०.२५ मि.मी., दिग्रस ८५ मि.मी., माळहिवरा ६६ मि.मी., कळमनुरी ७३.२५ मि.मी., वाकोडी ८३.७५ मि.मी., नांनदापूर ७९.२५ मि.मी., हत्ता ७४ मि.मी., औंढा ८३.५० मि.मी., येहाळेगाव ८७ मि.मी., सालना ८३ मि.मी. तर जावळा मंडळात ८७.५० मि.मी. पाऊस झाला. बीड जिल्ह्यात तलवाडा मंडळात ७५.२५ मि.मी. पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात २४० गावांना तडाखानांदेड जिल्ह्यातील १२ मंडळातील २४० गावांतील रबी पिकांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यात नांदेड शहर ६८ मि.मी., लिंम्बगाव ९९ मि.मी., तारोडा ८२.२५ मि.मी., नाळेश्वर ७०.७५ मि.मी., उस्माननगर ७६.२५ मि.मी., सोनखेड ७६.२५ मि.मी., शेवडी ७४ मि.मी., कालमबार ७६.२५ मि.मी., ताम्सा ६५.२५ मि.मी., अर्धापूर ७७.५० मि.मी. तर दाभाड मंडळात ६९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

टॅग्स :RainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादNandedनांदेड