शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ई-लिलावासाठी कृउबाला आदेश

By admin | Updated: July 16, 2017 00:35 IST

औरंगाबाद : राज्यातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांना १५ आॅगस्टपूर्वी शेतीमालाची आॅनलाइन लिलाव पद्धत सुरूकरण्याचे आदेश कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील पहिल्या टप्प्यातील ३० बाजार समित्यांना १५ आॅगस्टपूर्वी शेतीमालाची आॅनलाइन लिलाव पद्धत सुरूकरण्याचे आदेश कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी दिले आहेत. यादृष्टीने जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत्या २९ दिवसांत शेतीमालाच्या हर्राशीची पारंपरिक पद्धत बंद होऊन आॅनलाइन लिलाव पद्धत अस्तित्वात येणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव मिळावा, बाजार समितीच्या कारभारात, लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण व्हावी, शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबविण्यात यावी. यासाठी केंद्र सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल मार्केट’ (ई-नाम) पोर्टल सुरू केले आहे. याद्वारे देशभरातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या आॅनलाइन एकमेकांना जोडल्या जाणार आहेत. यामुळे औरंगाबादेतील जाधववाडीत आलेला शेतीमाल परजिल्ह्यातील कृउबामधील खरेदीदार खरेदी करू शकतील. खरेदीदारांमध्ये स्पर्धा वाढल्याने शेतीमालास चांगला भाव मिळेल. राज्यात पहिल्या टप्प्यात ३० बाजार समित्यांमध्ये ‘ई-नाम’ सुरूकरण्यात येणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी कृषी व पणनचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी पुणे येथे राज्यातील कृउबाच्या सचिवांची बैठक घेतली. पहिल्या टप्प्यातील सर्व बाजार समित्यांना येत्या १५ आॅगस्टच्या अगोदर आॅनलाइन लिलाव सुरूकरण्याचे आदेश देण्यात आले. यामुळे बाजार समित्यांचे कर्मचारी कामाला लागले आहेत. केंद्र शासनाने जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १३ कॉम्प्युटर, १३ यूपीएस, ४ लेझर प्रिंटर, १ एलईडी, २ वेबकॅमेरे, २ टॅब्लेट आदी साहित्य दिले आहे. बाजार समितीने लीज लाइनसाठी बीएसएनएलकडे रक्कम भरली असून, येत्या ८ दिवसांत लीज लाइन टाकण्यात येणार आहे. धान्याच्या अडत बाजारातील ४ सेल हॉलमध्ये ई-लिलावासाठी संगणक व अन्य यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी सेलहॉलमध्ये छोटी केबिन तयार करण्यात येईल. येत्या बुधवारी १९ जुलै रोजी ई-लिलावाचे प्रात्यक्षिक घेतले जाईल, अशी माहिती सचिव विजय शिरसाठ यांनी दिली. १५ आॅगस्टआधीच ई-लिलाव सुरूकरण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. सॉफ्टवेअर कंपनीने बाजार समितीमध्ये एका मंडी अ‍ॅनलिस्टची नेमणूक केली आहे. ई-लिलावासाठी ५८ पैकी ४६ अडत्यांना व ८१ खरेदीदारांना कंपनीतर्फे प्रशिक्षण देण्यात आले आहे. बाजार समितीच्या चार कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण दिले जात आहे.