शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

दारिद्र्य रेषेखालील ‘सुकन्या’ लाभापासून वंचित !

By admin | Published: May 20, 2014 12:16 AM

रविंद्र भताने, चापोली १ जानेवारी २०१४ पासून महाराष्टÑ शासनाने दारिद्र्यरेषेखालील जन्मलेल्या मुलींसाठी कल्याणकारी व मुलींसाठी ‘संजीवनी’ ठरेल अशी सुकन्या योजना

रविंद्र भताने, चापोली १ जानेवारी २०१४ पासून महाराष्टÑ शासनाने दारिद्र्यरेषेखालील जन्मलेल्या मुलींसाठी कल्याणकारी व मुलींसाठी ‘संजीवनी’ ठरेल अशी सुकन्या योजना अंमलात आणली आहे. मात्र चापोलीसह चाकूर तालुक्यात ही योजना अंमलात आलीच नाही, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील जन्मलेल्या ‘सुकन्या’ ह्या ‘सुकन्या’ योजनेपासून वंचित राहतील की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुलींचे शिक्षण व आरोग्य सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलाइतका मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात ‘सुकन्या योजना’ शासनाने सुरू केली आहे. मुलीचा जन्म झाल्यावर परिसरातील अंगणवाडी सेविका/मुख्य सेविका यांनी त्याची नोंद घ्यावी व अर्जासह ही माहिती बालविकास प्रकल्पाधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे द्यावी व या विभागामार्फत ती माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्याकडे देण्याचे स्पष्ट निर्देश या योजनेत आहेत. मात्र योजना सुरू होऊन ४ महिने उलटले तरीही एकही नोंद अद्याप करण्यात आलेली नाही. अंगणवाडी सेविकांना या योजनेची माहितीही नाही. शासनाने मुलींसाठी ‘संजीवनी’ ठरणारी अशी ‘सुकन्या’ योजना सुरू केली आहे. मात्र केवळ या योजनेची जनजागृती न केल्यामुळे आज दारिद्र्यरेषेखालील अनेक ‘सुकन्या’ ह्या योजनेपासून वंचित राहत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे योजना अंमलात आणण्यात अडचणी आल्या. मात्र आता सर्वांना त्यांच्या परिसरातील दारिद्र्यरेषेखालील जन्मलेल्या मुलींच्या नोंदी घेण्याचे निर्देश देऊ व एकही मुलगी या योजनेपासून वंचित राहणार नाहीत, असे मत प्रभारी गटविकास अधिकारी बी.टी. चव्हाण यांनी व्यक्त केले. अशी आहे ‘सुकन्या’ योजना... मुलीच्या नावाने राज्य सरकार विमा काढणार आहे. त्यासाठी २१ हजार २०० रुपये एकावेळी जमा केले जाणार आहे. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला १ लाख रुपये मिळतील. त्यापूर्वी तिचा मृत्यू किंवा विवाह झाल्यावर सर्व रक्कम शासनाच्या खात्यावर जमा होणार आहे. ९ वी ते १२ वीपर्यंत ६०० रुपये शिष्यवृत्ती सहा महिन्याप्रमाणे दिली जाईल. १०० रुपये शुल्क भरून मुलीच्या पित्याच्या नावेही विमा काढण्यात येणार आहे. पालकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार, अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार. अपघातात दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास ७५ हजार, अपघातात एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास ३७ हजार ५०० रुपये मिळणार आहेत.