शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

पाण्याचा गैरवापर केल्यास लाखांचा दंड

By admin | Published: February 16, 2016 11:40 PM

परभणी : शहरात नळाच्या पाण्याचा अनावश्यक वापर करताना आढळल्यास संबंधिताविरुद्ध एक लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्तांनी मंगळवारी काढले आहेत.

परभणी : शहरात नळाच्या पाण्याचा अनावश्यक वापर करताना आढळल्यास संबंधिताविरुद्ध एक लाख रुपयांपर्यंत दंड करण्याचे आदेश महापालिकेच्या आयुक्तांनी मंगळवारी काढले आहेत. परभणी शहरात राहाटी येथील बंधाऱ्यातून नळयोजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहरात मागील चार महिन्यांपासून टंचाईची स्थिती आहे. सद्य:स्थितीला आठ ते दहा दिवसांआड शहरवासियांना पाणी दिले जात आहे. त्यामुळे उपलब्ध पाणी जास्तीत जास्त कालावधीपर्यंत पुरविण्याची कसरत मनपाला करावी लागत आहे. मात्र, दुसरीकडे नळाला पाणी सुटल्यानंतर काही नागरिक या पाण्याचा बेजबाबदारपणे वापर करीत असल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून पहावयास मिळत होते. स्वत:च्या घरातील पाणी भरणे झाल्यानंतर नागरिकांनी नळ बंद करुन ठेवणे अपेक्षित आहे. परंतु, नळाला पाणी येत असल्याने ते अंगणात, रस्त्यावर पाईपद्वारे शिंपडणे, शौचालयात किंवा नालीमध्ये नळ सोडून देणे, वाहने धुणे, बोअर-विहिरीमध्ये नळाचे पाणी सोडून देणे असे प्रकार होत असल्याचे मनपा प्रशासनाला आढळून आले. त्यामुळे अशा प्रकारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या नळधारकाविरुद्ध ५ हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे. तसेच घराचा बांधकाम परवाना रद्द करणे, नळजोडणी कायमस्वरुपी बंद करण्यासारखी कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे. (प्रतिनिधी)