शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

भूसंपादन अधिसूचनेस स्थगिती

By admin | Published: May 28, 2014 1:10 AM

औरंगाबाद : भूसंपादन नुकसानभरपाई देण्याबाबत काढलेल्या अधिसूचनेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे.

औरंगाबाद : ग्रामीण भागातील जमिनीचे भूसंपादन करताना बाजारभावाच्या फक्त एक पट एवढी नुकसानभरपाई देण्याबाबत महाराष्टÑ शासनाने काढलेल्या दि. १९ मार्च २०१४ च्या अधिसूचनेस मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी अंतरिम स्थगिती दिली आहे. थोडक्यात हकीकत अशी : जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाटोदा साठवण तलावाकरिता दोनशे हेक्टर जमीन भूसंपादन करण्याकरिता भूसंपादन अधिनियम १९८४ च्या कलम ४ अ नुसार अधिसूचना पाठवली व कलम ९ खाली ६ आॅगस्ट २०१२ रोजी नोटिसा देण्यात आल्या. ग्रामीण भागातील जमिनीचे अधिग्रहण करताना बाजारभावाच्या एक ते दोन पट किंमत द्यावी अशी कायद्यात तरतूद आहे. बाजारभाव एक ते दोन पट ठरवताना ग्रामीण व शहरी भाग व प्रकल्पापासून प्रत्यक्ष अंतर हा निकष नमूद केला आहे; मात्र महाराष्टÑ शासनाने दि. १९ मार्च २०१४ च्या अधिसूचनेद्वारे ग्रामीण भागातील सर्व जमिनीचा बाजारभाव एक पटच असेल, असे जाहीर केले. शासनाने कल्याणकारी कायद्याचा सोयीचा; परंतु चुकीचा अर्थ काढून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांवर अन्यायकारक निर्णय लादला व कायद्याचे कलम २६ व परिशिष्ट १ निष्प्रभ केले, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आला. याचिकाकर्ते पंजाबराव बोराडे यांच्यातर्फे अ‍ॅड. सतीश तळेकर, अ‍ॅड. उमाकांत आवटे व अ‍ॅड. दीपक काकडे यांनी म्हटले आहे की, ग्रामीण भागातील अधिग्रहित जमिनीची नुकसानभरपाई करताना बाजारभावाच्या एक ते दोन पट किंमत वाढवून देण्याची कायद्यातील तरतूद व त्यानुसार शासनास देण्यात आलेले कायदेशीर अधिकार बदलता येणार नाहीत. संसदेने पारित केलेल्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार महाराष्टÑ शासनाला नाही. सदरील अधिसूचनेमुळे भारतीय राज्यघटनेतील कलम १४ खालील समता व समान हक्क या मूलभूत तत्त्वाचा, घटनेतील कलम ३०० (अ) मधील मालमत्ता व मालमत्ता अधिकाराचा भंग होतो. म्हणून ही अधिसूचना घटनाबाह्य ठरवून रद्द करण्यात यावी. कारण ही अधिसूचना २०१३ च्या कायद्याच्या कलम २६, परिशिष्ट-१ शी सुसंगत नाही. या अधिसूचनेमुळे महाराष्टÑातील लाखो शेतकर्‍यांना कायमस्वरूपी नुकसान सोसावे लागले असते. असेही अ‍ॅड. तळेकर यांनी म्हटले. ग्रामीण भागातील जमिनीचे अधिग्रहण करताना बाजारभावाच्या एक ते दोन पट किंमत द्यावी अशी कायद्यात तरतूद आहे. बाजारभाव एक ते दोन पट ठरवताना ग्रामीण व शहरी भाग व प्रकल्पापासून प्रत्यक्ष अंतर हा निकष नमूद केला आहे.