शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

एलबीटी ऐरणीवर...

By admin | Published: May 28, 2014 1:06 AM

औरंगाबाद : महानगरपालिका हद्दीतून एलबीटी कर कायमचा हटविण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने असहकार आंदोलन सुरू केले आहे.

औरंगाबाद : महानगरपालिका हद्दीतून एलबीटी कर कायमचा हटविण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाने असहकार आंदोलन सुरू केले आहे. औरंगाबादेतच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील मनपा हद्दीत व्यापारी असे आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असून व्यापारी महासंघाअंतर्गत येणार्‍या अन्य व्यापारी संघटनांच्या बैठका घेण्यात येत आहेत. एलबीटीविरोधात ही अंतिम लढाई असल्याची प्रतिक्रिया व्यापारी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली. दरम्यान, महापालिकेने एलबीटी न भरणार्‍यांवर जप्तीचा निर्णय घेऊ, असा इशारा दिला आहे. त्यामुळे महापालिका आणि शहरवासीयांच्या दृष्टीने हा विषय स्फोटक बनला आहे. राज्य शासनाला कोणत्याही परिस्थितीत एलबीटी रद्द करावाच लागेल, असे आता शहरातील व्यापार्‍यांना वाटत आहे. महापालिकेचे ‘अर्थचक्र’ एलबीटीमुळे चक्रव्यूहात अडकले आहे. एलबीटी भरण्यास व्यापार्‍यांनी विरोध सुरू केल्यामुळे मे महिन्यात १८ ऐवजी ११ कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळाले आहे. त्यामुळे पालिकेसमोर आर्थिक आव्हानांसह विकासकामे करण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. ५ जून रोजी शासन एलबीटीबाबत निर्णय घेणार असल्याची चर्चा व्यापार्‍यांत सुरू आहे. तोपर्यंत पालिका प्रशासनही वाट पाहण्याच्या भूमिकेत आहे. मनपाकडे ९५ कोटी रुपयांचा मालमत्ताकर आणि पाणीपट्टी मिळूनही तिजोरीत फक्त ११ कोटी रुपये शिल्लक आहेत. चार महिन्यांत ८७ कोटींचा हिशेब प्रशासनाने चुकता केला. विकासकामांसह मनपाच्या दैनंदिन खर्चावर मोठा परिणाम १ जूनपासून होण्याचे संकेत आहेत. आजवरच्या गोळाबेरजेनुसार २७ मेपर्यंत १७ कोटी रुपये एलबीटीतून जमा होणे क्रमप्राप्त असताना सध्या ११ कोटी रुपयांच्या आसपासच रक्कम जमा झाली आहे. आयुक्तांचे मत असे... एलबीटी बंद व्हावा अशी व्यापार्‍यांची मागणी आहे. मनपाचे अर्थकारण एलबीटीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. गेल्या वर्षी १९५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. व्यापार्‍यांनी विरोध केला असला तरी ७० टक्के एलबीटी पालिकेला या महिन्यात मिळाला आहे. १०० व्यापार्‍यांनी १० रुपये एलबीटी भरला आहे, यावर आयुक्त म्हणाले, या प्रकरणात काय कारवाई करायची याचा निर्णय घेण्यात येईल. फक्त आपत्कालीन कामे लोकसभा निवडणुकीसाठी ५ मार्च रोजी लागलेली आचारसंहिता २६ एप्रिल रोजी शिथिल झाली. त्यानंतर लगेच पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागली. ती आचारसंहिता २८ जूनपर्यंत असणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, पथदिवे, ड्रेनेज, नालेसफाई या कामांकडेच पालिका लक्ष देणार आहे. विकासकामांच्या संचिका, अंदाजपत्रकांची मंजुरी या काळात होणार नाही.