शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

उणिवांवर मात करायला शिका -इरा सिंघाल

By admin | Published: April 24, 2016 11:28 PM

औरंगाबाद : आधी मी बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत होते. चांगले काम, उत्तम पगार असूनही त्या ठिकाणी मन रमले नाही. मला या व्यवस्थेत काही तरी बदल घडवायचा होता

औरंगाबाद : आधी मी बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत होते. चांगले काम, उत्तम पगार असूनही त्या ठिकाणी मन रमले नाही. मला या व्यवस्थेत काही तरी बदल घडवायचा होता. समाजासाठी काही तरी करायचे होते, त्याच पे्ररणेने २००९ साली मी नोकरी सोडली आणि आयएएस परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली, असे मत स्वत:च्या शारीरिक अपंगत्वावर मात करून अतिशय खडतर समजल्या जाणाऱ्या आयएएस परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या इरा सिंघाल यांनी व्यक्त केले. एका खाजगी कार्यक्रमासाठी त्या शहरात आल्या असताना विविध स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी रविवारी मार्गदर्शन केले.लहानपणापासूनच ‘स्कोलियासिस’ या पाठीच्या कण्याशी निगडित आजारपणामुळे इरा यांना अपंगत्व आले व हाताच्या हालचालींवर मर्यादा आल्या. अशा कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळविली व एमबीएदेखील केले. याविषयी सांगताना त्या म्हणाल्या, माझ्यात काही तरी कमी आहे म्हणून कुढत बसणे मला मान्य नव्हते. मी परिस्थितीचा स्वीकार केला आणि त्यावर मात करण्याचे ठरविले. यासाठी मला माझ्या कुटुंबियांनी आणि मित्र-मैत्रिणींनी बळ दिले. कुठल्याही गोष्टीला न घाबरण्याचे संस्कार माझ्यावर लहानपणीच झाले. प्रत्येकाकडून काही तरी नवीन शिकत राहण्याचा माझा छंद आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, परीक्षा पद्धती तसेच शिक्षण पद्धतीला कायम दोष देत बसण्यापेक्षा स्वत:मधील उणिवांचा शोध घ्या, त्यावर मात करायला शिका आणि स्वत:च्या चुका शोधण्याची, त्या दुरुस्त करण्याची सवय लावा. कायम वास्तववादी राहण्याचा सल्लाही त्यांनी उपस्थिताना दिला. स्पर्धा परीक्षा आणि खास करून यूपीएससीची तयारी कशी करावी यासंबंधी इरा यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. आयपीएस हरेश्वर स्वामी व भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत यश मिळविणारे गौरव रॉय यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला.सकाळी ११ वा. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात इरा सिंघाल विद्यार्थ्यांना भेटणार होत्या. परंतु प्रवासादरम्यान आलेल्या अडचणींमुळे त्या तब्बल ४ तास उशिरा आल्या. अशा परिस्थितीतही शेकडो विद्यार्थी त्यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी उन्हातान्हात बसून होते. त्या मंचावर येताच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन क रताना इरा म्हणाल्या की, स्वत:ला प्रश्न विचारायची सवय लावा. इतरांच्या तुलनेत आपण महान आहोत, असा विचार डोक्यात येताच स्वत:ची तुलना विश्वाशी करा, आपण कुठे आहोत लगेच लक्षात येईल. तसेच एकाच क्षेत्रात अडकून न राहता करिअरच्या अनेक नव्या संधी कायम शोधत राहा, असे आवाहनही त्यांनी केले.