शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
4
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
5
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
6
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
7
टेबल फॅन खूपच खराब झालाय... स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' सोपी पद्धत, चमकेल नव्यासारखा
8
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
9
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
10
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
11
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
12
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
13
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
14
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
15
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
16
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
17
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
18
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
19
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
20
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

जो जे वांछील, ते तो खावो! गरिबांचे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनले: शाहू पाटोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 16:30 IST

आपल्या खाद्य संस्कृतीची लाज वाटणे, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. ज्यांना जे खायचे, ते खाऊ द्या

छत्रपती संभाजीनगर : ज्वारी, बाजरी, नाचणी, राळे ही तृणधान्ये (मिलेट्स) गरिबांच्या ताटात असत. या तृणधान्यांतील पोषक तत्त्वांचे महत्त्व समजू लागल्याने हॉटेलच्या मेनूमध्ये आता मिलेट्स डिश दिसतात. गरिबांचे हे अन्न आता श्रीमंतांचे झाल्याने ते महाग बनल्याचे प्रतिपादन लेखक शाहू पाटोळे यांनी केले.

वाळूज येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४४ व्या साहित्य संमेलनातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मंचावर लेखक शाहू पाटोळे यांची मुलाखत अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि भूषण कोरगावकर यांनी घेतली. पाटोळे म्हणाले की, पूर्वी ग्रामीण भागात बाराही महिने सर्वांच्या जेवणात रानभाज्या असत. अनेक भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात. करडईचे तेल घरोघरी वापरले जाई. मात्र, आता करडई तेलाचे महत्त्व कळाल्याने या तेलाचे दर चढे असतात. शेतातील तण काढण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जात असल्याने रानभाज्या दुर्मीळ होत आहेत. आता जो तो चुलीवरचे जेवण पसंत करत आहे. जेव्हा चपला नव्हत्या, तेव्हा पायी जात. आता लोक विनाचपलांचे फिरताना आपण पाहतो. १९७२ च्या दुष्काळाला इष्टापत्ती असल्याचे बोलले जाते. ते कसे, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, दुष्काळात इंदिरा गांधी यांनी माणसे जगविली. तेव्हाच पाम तेल स्वयंपाक घरात आले. प्रथम अस्पृश्य लोक विस्थापित झाले.

जो जे वांछील, ते तो खावो....गोहत्या कायद्याचे रूपांतर आता गोवंश हत्येत झाले. याचा परिणाम मुस्लिमांवर होतो, या दृष्टिकोनातून काही लोक पाहतात. परंतु, तसे नाही. कारण हे खाद्य काही केवळ एकाच समूहाचे नाही. असे असते तर खाटकांकडे हिंदू कॅलेंडर नसते. आपल्या खाद्य संस्कृतीची लाज वाटणे, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. ज्यांना जे खायचे, ते खाऊ द्या, असेही पाटोळे यांनी नमूद केले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरliteratureसाहित्य