शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बागडे, भुमरेंच्या संस्थांना दिलेली ‘इरादापत्रे’ खंडपीठाकडून रद्द; शासनालाही बजावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 19:51 IST

बृहत्आराखडा बनवताना ‘स्थळबिंदू’ ठरवण्याच्या प्रक्रियेत शासनाने हस्तक्षेप करू नये, खंडपीठाने बजावले

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरलगत चितेपिंपळगाव येथे नवीन महाविद्यालय स्थापन करण्यासाठी शासन निर्णय काढून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या एन-५, छत्रपती संभाजीनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेला आणि खासदार संदीपान भुमरे यांच्या पाचोड येथील संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला दिलेली ‘इरादापत्रे’ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मंगेश पाटील आणि न्या. एस. पी. ब्रह्मे यांनी सोमवारी (दि. २६) रद्द केली. बृहत्आराखडा बनवताना ‘स्थळबिंदू’ ठरवण्याच्या प्रक्रियेत शासनाने हस्तक्षेप करू नये, असे खंडपीठाने बजावले आहे.

वरील संस्थांना दिलेली इरादापत्रे रद्द करण्याची आणि चितेपिंपळगाव येथील निसर्गदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित तुळजाभवानी कला व विज्ञान महाविद्यालयाची रद्द केलेली संलग्नता पुन्हा देण्याची विनंती करणाऱ्या याचिकेच्या अनुषंगाने खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

चितेपिंपळगाव येथे ‘स्थळबिंदू’ अस्तित्त्वात नसताना राज्य समितीने विद्यापीठाला तो बृहत् आराखड्यात घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे कलम १०७नुसार ‘स्थळबिंदू’ ठरवण्याची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठाची असताना राज्य समिती विद्यापीठाला निर्देश देऊ शकत नाही, असा युक्तिवाद वादीतर्फे ॲड. महेश घाटगे यांनी केला, तो ग्राह्य धरत खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.

वादी संस्थेतील व्यवस्थापन आणि घरगुती वादातून झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने नेमलेल्या डॉ. भालचंद्र वायकर समितीच्या अहवालानुसार तुळजाभवानी कला व विज्ञान महाविद्यालयात असुविधा आहेत. महाविद्यालय विद्यापीठ कायद्याच्या कलम १०८ची पूर्तता करीत नाही. सबब, विद्यापीठाची संलग्नता रद्द करण्याची शिफारस समितीने केली होती. त्यावरून विद्यापीठाने ६ सप्टेंबर २०२२ला महाविद्यालयाची संलग्नता रद्द केली होती. या निर्णयाविरूद्ध वादी संस्थेने याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने हस्तक्षेपास नकार देत याचिका फेटाळली होती.

दरम्यान, चितेपिंपळगाव येथे नवीन महाविद्यालयासाठी स्थळबिंदू निश्चित करून जाहिरातीद्वारे प्रस्ताव मागविले होते. त्यानुषंगाने वादी संस्थेला २००९ साली दिलेली परवानगी अबाधित आहे. केवळ संलग्नता रद्द झाली. महाविद्यालयाने त्रुटींची पूर्तता केली असून, संस्थेला संलग्नता देण्याची विनंती केली होती. विद्यापीठाकडे दाखल पंडित दीनदयाळ संस्थेच्या प्रस्तावाची होकारार्थी शिफारस शासनाकडे केली होती, तर संत ज्ञानेश्वर संस्थेची नकारार्थी शिफारस केली होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे ॲड. संभाजी टोपे व शासनातर्फे ॲड. के. जी. घुटे पाटील यांनी काम पाहिले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेSandipan Bhumreसंदीपान भुमरेDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद