शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमधील वाद मिटला, कोल्हेंनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली; फेसबुकवर केली भावनिक पोस्ट
2
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
3
राज ठाकरेंच्या उमेदवारांना भाजप पाठिंबा देणार? बाळा नांदगावकरांचे महत्वाचे वक्तव्य
4
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
5
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
6
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
7
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...
8
“१०५चा आकडा फेक, मविआत ४-५ जागांवर अजून मतभेद”: नाना पटोले; काँग्रेसची यादी कधी येणार?
9
उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंना सदा सरवणकरांनी डिवचलं; म्हणाले, "एक दिवस..."
10
प्रभासने वाढदिवसानिमित्त चाहत्यांना दिले सरप्राइज, 'राजा साब'चा दमदार पोस्टर रिलीज
11
Jio Financial ची आणखी एक खेळी; 'या' कंपनीसोबत विकणार इन्शूरन्स पॉलिसी, चर्चा कुठवर?
12
बेंजामिन नेतन्याहू यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचलं हिजबुल्लाहचं ड्रोन, पण...! इस्रायलचं टेन्शन वाढलं
13
दिवाळीत Cash मध्ये केवळ 'इतकं'च खरेदी करू शकता Gold; जास्त घेतल्यास द्यावी लागेल 'ही' माहिती
14
चोरी करण्यासाठी विमानाने जायचे; हायटेक गँगचा पोलिसांनी केला पर्दाफाश, ५ जणांना अटक
15
माहिममध्ये रंगणार तिरंगी लढत, ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर
16
प्रियंका गांधी यांनी वायनाड येथून भरला उमेदवारी अर्ज, काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन
17
एकाच घरात आमदार, खासदार पदे; राज्याच्या राजकारणात फक्त 'या' घराण्यांचं वर्चस्व?
18
जाहीर सभेत प्रवीण माने हुंदके देऊन ढसाढसा रडले, वडिलांच्याही डोळ्यांत पाणी; नेमकं काय घडलं?
19
'अचानक सर्वकाही ठीक होईल, या भ्रमात राहू नका', भारत-चीन करारावर व्हीके सिंह स्पष्ट बोलले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार

लाइनमन म्हणाला, साहेब... तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 7:31 PM

लाइनमनचे म्हणणे गांभीर्याने घ्या, विभागीय आयुक्तांनी सूचना केल्यानंतर यंत्रणेकडून आढावा

औरंगाबाद : शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेला सुरळीत करण्यासाठी महसूलची यंत्रणा जुंपली असून, बारीक-बारीक मुद्द्यांवर प्रशासन लक्ष देत आहे. वितरण सुरळीत होण्यासाठी लाइनमनच्या बैठकीत एकाने तिसऱ्या दिवशी शहराला पाणीपुरवठा होणे शक्य असल्याचे सांगितले. त्यावर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी महसूल, एमजेपी व मनपाच्या यंत्रणेला त्याचे म्हणणे गांभीर्याने घेण्याच्या सूचना केल्या. आयुक्तांच्या सूचनेनंतर त्या लाइनमनसोबत तिन्ही यंत्रणेतील प्रमुखांनी वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. त्या लाइनमनने दिलेल्या सुचनांनुसार, प्रशासन वितरणात किती सुधारणा करणार, याकडे लक्ष लागले आहे.

३१ अधिकाऱ्यांनी शहरातील पूर्ण जलकुंभावरून होणाऱ्या जलवितरण व्यवस्थेचा आढावा घेत, त्यातील त्रुटी, गळती, चोऱ्यांचा अहवाल तयार केला आहे. त्यानंतर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गुरूवारी लाइनमन्सची बैठक घेतली. फिडर लाइनवर असलेल्या नळजोडण्या ताबडतोब खंडित कराव्यात, याशिवाय शहरातील पाण्याच्या टाक्यांत पुरवठा करण्याकरिता पाणीसाठा होणार नाही, तसेच मेन लाइनवर असलेल्या नळ कनेक्शनला त्वरित मीटर बसविण्याचे आदेश चव्हाण यांनी दिले. त्यानुसार, पथकांनी शुक्रवारी कार्यवाही सुरू केली. शहरात होणारा पाणीपुरवठा दोन किंवा तीन दिवसाआड कसा करता येईल, यासाठी लाइनमनच्या सूचना ऐकून घेत, उपाययोजना करण्यात येणार आहेत.

लाइनमनकडे उपाय, बाकीचे काय करत आहेतलाइनमनकडे जर पाणीपुरवठ्यातील त्रुटी दुर करण्याचा उपाय असेल, तर मग बाकीचे अभियंते व इतर यंत्रणा काय करीत आहे, असा सवाल विभागीय आयुक्तांनी उपस्थित केला. अनेक ठिकाणी गळत्या आहेत. मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळ कनेक्शन काढण्यात येणार आहेत. पुन्हा जर त्यावर कनेक्शन घेतले गेले, तर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याचे केंद्रेकर यांनी सांगितले. येत्या काही दिवसांनी मुख्यमंत्री पुन्हा योजनेच्या कामाचा आढावा घेणार आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी