शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

आरोग्य यंत्रणेवर ५२ योजनांचा भार; ऑनलाइन काम,रिक्त पदांमुळे अधिकारी-कर्मचारी त्रस्त

By मुजीब देवणीकर | Published: August 20, 2024 4:04 PM

विशेष बाब म्हणजे आरोग्य विभागात रिक्त पदांचा अनुशेष झपाट्याने वाढत असताना शासन ही पदे भरण्यात स्वारस्यच दाखवत नाही.

छत्रपती संभाजीनगर : केंद्र, राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी सुरू आहे. यातील बहुतांश योजना आरोग्य विभागाच्याच आहेत. सर्व योजनांची माहिती ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करावी लागते. सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी वेळ मिळतोय. बहुतांश वेळ योजनांची माहिती भरण्यातच जातोय, अशी कर्मचाऱ्यांची ओरड आहे. विशेष बाब म्हणजे आरोग्य विभागात रिक्त पदांचा अनुशेष झपाट्याने वाढत असताना शासन ही पदे भरण्यात स्वारस्यच दाखवत नाही.

एखाद्या शासकीय विभागावर योजनांचा भार किती टाकावा याला काही मर्यादा असतात, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या तब्बल ५२ याेजनांवर काम करावे लागत आहे. महापालिका आरोग्य विभाग, नगरपरिषद, ग्रामपंचायत, राज्याचे आरोग्य विभाग आदी यंत्रणांवर या योजनांची जबाबदारी सोपविली आहे. लाडकी बहीण, वयोश्री सारख्या नवीन योजनांची भर सुरूच आहे. यापूर्वीच आरोग्य यंत्रणा ५० योजनांचा भार सांभाळत होती. एखाद्या योजनेची माहिती भरण्यास विलंब झाला तर थेट मंत्रालयापासून फोन खणखणत असतात. नेटवर्क प्राॅब्लेम, माहिती संकलित न होणे या तक्रारींशी वरिष्ठांना काहीच देणेघेणे नसते. त्यामुळे अनेक कर्मचारी रात्री उशिरापर्यंत बसून माहिती अपलोड करतात. काही कर्मचारी घरी लॅपटॉपद्वारे काम करीत बसतात. आमचे दु:ख शासन दरबारी कोणीही ऐकायला तयार नसल्याचे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कोणत्या प्रमुख योजना५२ योजनांमध्ये आरसीएच, सोनोग्राफी लिंगनिदान कायदा, १०८ ॲम्बुलन्स सर्व्हिस, असांसर्गिक आजार, कुष्ठरोग, माता आरोग्य, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, थायराॅइड आजार, क्षयरोग निदान उपचार, तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, रेबीज नियंत्रण कार्यक्रम, नियमित विविध लसीकरण, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, आयुष्मान भारत योजना, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य, साथ नियंत्रण, डायरिया नियंत्रण, नवजात बालकगृहभेट, सुरक्षित मातृत्व अभियान, गर्भधान नियंत्रण कार्यक्रम, मलेरिया-डेंग्यू, श्वसनरोग, जन्म-मृत्यू, नर्सिंग होम नोंदणी, उष्माघात, माता व बालमृत्यू, आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम आदी.

अंमलबजाणीतील त्रुटीइंटरनेट असो किंवा नसो सर्व कार्यक्रमांना पोर्टलवर नोंदणी बंधनकारक, एनएम, आशा वर्कर यांना प्रशिक्षण नाही, कमी मनुष्यबळ, रुग्णसेवेवर परिणाम, संगणक बिघाड, आशा वर्कर मानधन असेल तर योजनेला देतात प्रतिसाद, औषध निर्माण अधिकारी यांची शंभर टक्के पदे भरणे आवश्यक, एमपीडब्ल्यूची पदे भरणे आवश्यक आहे.

हे तर आमचे कर्तव्यचशासकीय नोकरी करीत असताना शासन योजनांची अंमलबजावणी करणे हे आमचे कर्तव्य आहे. प्रत्येक योजनेची शंभर टक्के अंमलबजावणी करावीच लागते. योजनांच्या बाबतीत कोणतीही तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही.-पारस मंडलेचा, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका