शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

एकाच भूवैज्ञानिकावर भार

By admin | Published: February 17, 2016 12:09 AM

गजानन वानखडे , जालना गेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत असतानाच जिल्ह्यातील भू जल पातळीची पाहणी करणाऱ्या भू वैज्ञानिकांची दोन पदे दीड वर्षापासून रिक्त

गजानन वानखडे , जालनागेल्या चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत असतानाच जिल्ह्यातील भू जल पातळीची पाहणी करणाऱ्या भू वैज्ञानिकांची दोन पदे दीड वर्षापासून रिक्त असल्याने जिल्ह्यातील अनेक भागात समस्या गंभीर झाली आहे. मात्र, जिल्हा परिषदेचे प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. आगामी काळात दुष्काळाची दाहकता अधिक होणार असून, प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज आहे. जिल्ह्यात सलग चार वर्षांपासून आठही तालुक्याला पाणीटंचाईचे चटके बसत आहे. जिल्ह्यातील भूगर्भात जलपातळीची काय स्थिती आहे हे महत्वाचे काम या विभागाकडे आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वरिष्ठ एक भूजलवैज्ञानिक आणि दोन कनिष्ठ वैज्ञानिकांची पदे मंजूर आहेत. त्यांनी दिलेल्या अहवालावरच ग्रामीण भागात पाणीटंचाई नियोजनाचे काम केले जाते. परंतु एक वर्षापेक्षा जास्त काळापासून ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वरिष्ठ भूवैज्ञानिकाचे आणि कनिष्ठ वैज्ञानिकांची पदे रिक्त आहेत. ज्यांच्या अहवालावरच जिल्ह्यातील कोणत्याही नवीन पाणीपुरवठा योजना, विंधनविहिरींची दुरूस्ती, खोलीकरण, एमआरजीएसच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विहिरी कूपनलिकांसाठी वरिष्ठ भू वैज्ञानिकांचे प्रमाणपत्र गरजेचे असते. परंतु भू वैज्ञानिकांचे पद रिक्त असल्याने प्रभारी कनिष्ठ भूवैज्ञानिकावर या विभागाचा कारभार सुरू आहे. जिल्ह्यातील ९७२ गावांतील भूजल स्थिती जाणून घेण्यासाठी एका वैज्ञानिकाला प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नाही. परिणामी पाहणी न करताच अनेक अहवाल देण्यात आल्याचे समोर आले आहे.अनेक तालुक्यांत होत असलेल्या कामांचे अहवाल चुकीचे जात आहेत. विशेष म्हणजे भूवैज्ञानिकांनी दिलेल्या अहवालावरच जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग काम करत असल्याने शासनाच्या लाखो रूपयांचा चुराडा होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री पद जिल्ह्याला मिळाले आहे. परंतु त्याच जिह्यात भू वैज्ञानिकांचे पदे रिक्त कसे काय असा सवाल ग्रामीण भागातील जनतेतून उपस्थित केला जात आहे.