शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Lockdown In Aurangabad : महापालिकेची वॉररूम २४ तास खुले; पोलिसांसोबत महापालिका कर्मचारीही अखंड सेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 16:54 IST

‘लॉकडाऊन’मध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र स्वत:च्या जिवाची तमा न बाळगता आपले कर्तव्य निभावले.

ठळक मुद्देकोरोना काळात नागरिकांना तत्पर सेवापोलीस कर्मचाऱ्यांच्या जोडीला रस्त्यांवर पालिकेचे कर्मचारीही उभे 

औरंगाबाद : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या ‘लॉकडाऊन’मध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र स्वत:च्या जिवाची तमा न बाळगता आपले कर्तव्य निभावले. पहिल्यांदाच रस्त्यांवर उतरून पोलिसांच्या मदतीने ‘लॉकडाऊन’ यशस्वी केले. महापालिकेची वॉररूम २४ तास खुलेच आहे.

मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या सूक्ष्म नियोजनामुळेच हे शक्य झाले. ‘लॉकडाऊन’ यशस्वीतेसाठी तसेच कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी खास ‘कंट्रोल रूम’ची त्यांनी निर्मिती केली. मुख्य नियंत्रकांबरोबरच दोन पथकप्रमुखांनी २४ तास लक्ष ठेवून परिस्थिती हाताळली.कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी १० ते १८ जुलैदरम्यान संचारबंदी घोषित करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपा, पोलीस, महसूल प्रशासनाने ‘मायक्रो प्लॅनिंग’ केली. पाण्डेय यांनी लॉकडाऊन शंभर टक्के यशस्वीतेसाठी ‘कंट्रोल रूम’ची स्थापना केली. मनपाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्यावर मुख्य नियंत्रकांची जबाबदारी सोपवून कंट्रोल रूममध्ये १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर उतरून कर्तव्यावरील चारशे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंकुश लाडके यांच्यावर सुपरवायझरची जबाबदारी दिली.

कंट्रोल रूममध्ये १८ कर्मचारीशहरभर कर्तव्य बजावत असलेल्या मनपाच्या कर्मचाऱ्यांचा कामकाजाचा आढावा आणि परिस्थितीचे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘कंट्रोल रूम’मध्ये १८ कर्मचारी कार्यरत होते. दिवस-रात्र या कर्मचाऱ्यांनी योद्ध्याप्रमाणे आपले कर्तव्य बजावले. 10 जुलैपासून आतापर्यंत या कंट्रोल रूमला एकदाही कुलूप लागले नाही. फिल्डवर असलेल्या कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या, कर्मचारी काय करतात, याचा आढावा फोन तसेच व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून वॉररूममधील कर्मचाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. अनेकदा स्पॉटवर जाऊन तपासणी केली. तर रस्त्यावर नियुक्त पथकाने जिथे पोलीस उपलब्ध नव्हते, तिथे पॉइंट लावून पोलिसांची सुद्धा भूमिका निभावली.

मनपा कर्मचाऱ्यांचा अभिमान लॉकडाऊनच्या काळामध्ये पहिल्यांदाच मनपाचे कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. अत्यंत नियोजन पद्धतीने सर्वच कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊन यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. दिवस असो वा रात्र याची तमा न बाळगता परिस्थिती नियंत्रणासाठी हातभार लावला. विना तक्रार कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतुक तसेच अभिमानही आहे.-आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक, महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद