शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

Lok Sabha Election 2019 : ज्याची खावी पोळी; त्याची वाजवावी टाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 19:13 IST

खैरेंसोबतच्या बैठकीनंतर शांतीगिरी महाराजांनी घेतली माघार 

औरंगाबाद : वेरूळच्या जनार्दन स्वामी मठाचे मठाधिपती महामंडलेश्वर शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांच्यासोबत बुधवारी सकाळी झालेल्या बैठकीनंतर महाराजांनी सायंकाळी ४ वा. पत्रकार परिषदेत ‘ज्याची खावी पोळी; त्याची वाजवावी टाळी’ असे सांगून भक्त परिवाराने नि:स्वार्थी, कर्तृत्ववान उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. मी स्वत: व जय बाबाजी परिवाराचा कुणालाही पाठिंबा नाही, निवडणुकीत २ लाखांच्या आसपास मतदान मिळाले असते, त्यामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. 

नि:स्वार्थी उमेदवार कोण आहे, या व इतर अनेक प्रश्नांचा भडिमार पत्रकारांनी शांतीगिरी यांच्यावर केला. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम तारखेनंतर योग्य व कर्तृत्ववान उमेदवाराची निवड करून भूमिका जाहीर केली जाईल. ‘लढा राष्ट्रहिताचा व संकल्प शुद्ध राजकारणाचा’ हे ब्रीद घेऊन औरंगाबाद, जालना, शिर्डी-अहमदनगर, नाशिक, दिंडोरी, जळगाव, धुळे या ७ लोकसभा मतदारसंघांत बाबाजी सांगतील तेच धोरण असेल, असे शांतीगिरी म्हणाले. मतदारांनी नि:स्वार्थी उमेदवाराला  मतदान करावे, प्रलोभनाला मतदारांनी बळी पडू नये.  

समीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम शांतीगिरी महाराजांनी गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज घेतल्यामुळे राजकीय समीकरणांचा गुंता वाढण्याची चर्चा होती; परंतु त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. २००९ साली शांतीगिरी महाराजांनी १ लाख ४८ हजार २६ मते घेत काँग्रेसला पराभवाकडे नेले, तर शिवसेनेचे मताधिक्य कमी केले. शांतीगिरी महाराजांनी निवडणूक मैदानातून माघार घेतल्यामुळे भक्त परिवार स्वेच्छेने मतदान करण्यास मोकळा झाला आहे. कन्नड, गंगापूर आणि वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात जय बाबाजी परिवार असून, ती मते निर्णायक आहेत. मागील वर्षभरात महाराजांच्या मठात भाजप, काँग्रेस नेत्यांनी हजेरी लावून स्नेहभोजनासह राजकीय चर्चा केल्या होत्या. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019aurangabad-pcऔरंगाबाद