शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

वीरप्पनसोबत केली अभिनंदन वर्धमान यांची तुलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:13 IST

‘वीरप्पनसारखा (मिश्यांवर पीळ देऊन, हातवारे करून) तो गडी अभिनंदन आणला की नाही अवघ्या ६० तासांत परत,’ अशा शब्दांत हवाई दलातील वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची विकृत तुलना वीरप्पनसारख्या कुख्यात दरोडेखोराशी बीड जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश धस यांनी केली.

ठळक मुद्देकाँग्रेसवर टीका करण्याच्या प्रयत्नात सुरेध धस बरळले; चूक लक्षात येताच केली सारवासारव

औरंगाबाद : ‘वीरप्पनसारखा (मिश्यांवर पीळ देऊन, हातवारे करून) तो गडी अभिनंदन आणला की नाही अवघ्या ६० तासांत परत,’ अशा शब्दांत हवाई दलातील वैमानिक अभिनंदन वर्धमान यांची विकृत तुलना वीरप्पनसारख्या कुख्यात दरोडेखोराशी बीड जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश धस यांनी केली.बीड लोकसभा युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी बीड जिल्हा मित्रमंडळातर्फे भाजपचे आमदार सुरेश धस यांची बुधवारी रात्री कुलस्वामिनी मंगल कार्यालयात सभा घेण्यात आली. आ. धस यांनी काँग्रेस नेत्यांवर टीका करण्याच्या प्रयत्नात हवाई दलाचे धाडसी अधिकारी अभिनंदन वर्धमान यांची तुलना तामिळनाडूतील कुख्यात दरोडेखोर वीरप्पन याच्याशी केली. चूक लक्षात येताच सारवासारव करीत ‘मला त्यांची तुलना वीरप्पन याच्याशी करायची नाही’, असेही सांगून टाकले.आ. सुरेश धस म्हणाले की, ‘आधी बॉम्ब टाकायचे आणि ह्यांना सोडायचे. (काँग्रेस नेत्यांना) नको नाही तर हे पण जातील अतिरेक्याबरोबर. (हंशा, टाळ्या) तसं कसं करायचं. मारायचं नाही. पुन्हा माघारी आणायचं भाषण करायला. टावरचं लोकेशन सांगतंय की, तिथं तीनशे मोबाईल होते. जल्लोष करायला बोलावले होते. हे नालायक जे भारताचं सतत वाईट वाईट वाईट... पाहतात. हे अतिरेकी जल्लोष करीत असतानाच्या रात्री विमानं गेली. अडीच हजार ताशी किलोमीटर वेग असतोय त्याचा. त्याठिकाणी पटपट बॉम्ब टाकायचे असतात. २० मिनिटांत तर सगळा कार्यक्रम उरकायचा असतो. ओसामा बिन लादेनला काय दहा-पंधरा दिवस तापासीत होते काय? वटा वटा वटा गेले... खाली उतरले. पटा पटा पकडलं. उचललं. आणलं अन् समुद्रात नेऊन टाकलं. कबरबी नको. कायीच नको. मला वाटतं... यापुढं एअर स्ट्राईक करायचा असल, तर देशाच्या पंतप्रधानाला सांगून काँग्रेसचे दोन-चार लोक खाली लटकवून पाठवा. बॉम्ब टाकताना त्यांच्या हातात कॅमेरे द्या. तेथून खाली सोडा. ते खाली सुटल्यानंतर बॉम्बस्फोट होतील. त्याचं चित्रण करतील. परत त्यांना अणण्यासाठी अ‍ॅम्बसी विनंती करील ना.. आमचे ते खाली सोडलेले काँग्रेसचे नेते भारताकडं सोपवा. म्हणजे इकडं येऊन भाषण करतील. (हंशा.. टाळ्या.. शिट्या..) ‘तो आणला नाही का वीरप्पनसारखा गडी (मिशावर हात दाखवून वर्णन)’ वीरप्पन म्हणून त्यांचा अपमान करणार नाही; पण तो होता एक अभिनंदन पांडे. तामिळनाडूचा. गरीब पठ्ठ्या आला की नाही परत. मारलं त्याला. रक्तबंबाळ केलं. ‘भारत माता की जय’ म्हटलं तरी कळत नव्हतं. (चूक लक्षात आल्यामुळं.) आता काय करावा बबा. बोलावं का नाय. असं झालंय. त्यांची तुलना करत नाही; पण वीरप्पनसारखी स्टाईल हाय त्यांची. मी त्यांची तुलना करणार नाही; पण गडी आमचा ६० तासांत परत आला, अशा पद्धतीने आ. धस यांनी अभिनंदन वर्धमान यांची तुलना तामिळनाडूतील दरोडेखोर वीरप्पन याच्याशी केली. चूक लक्षात आल्यानंतर सारवासरावही केली. तत्पूर्वी, सोशल मीडियामुळे बोलायची भीती वाटत असल्याचेही कबूल केले. या सभेला बीड जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाElectionनिवडणूक