शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
3
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
4
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
5
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
6
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
7
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
8
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
9
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
10
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
11
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
12
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
13
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
14
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
15
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
16
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
17
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
18
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

औशात शेतकरी, शेतमजुरासह निराधारांचा महाआक्रोश मोर्चा

By संदीप शिंदे | Published: January 15, 2024 6:21 PM

सोयाबीनला ९ हजार भाव, १०० टक्के पिकविमा देण्याची मागणी

औसा : मराठवाड्यातील शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी औसा तहसील कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे केले आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत ऊसाला भाव का मिळत नाही, असा सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला. जोपर्यंत सोयाबीनला प्रतिक्विंटल ९ हजार भाव, १०० टक्के पिकविमा, निराधारांना ३ हजार मानधन मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

औसा तालुक्यात १५ दिवस १०० गावातून १५० कि.मी. पायीदिंडी काढून शेतकरी, शेतमजूर आणि निराधारांच्या मागण्याची जनजागृती करण्यात आली. किल्ला मैदान ते औसा तहसील कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढून सरकारचे लक्ष वेधले. यावेळी कांदा निर्यात बंदी उठवा, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान द्याओ, चालू बाकी करणाऱ्यांसाठी व्याजासह कर्जाची संपूर्ण रक्कम भरण्याची अट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शेतकरी विरोधी धोरण राबविणाऱ्या सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी नेते सत्तार पटेल, राजेंद्र मोरे, अरुण कुलकर्णी, राजू कसबे, शामभाऊ जाधव आदींसह शेतकरी, शेतमजूर, आणि निराधार उपस्थित होते.

१९ जानेवारीला रेल्वे अडवणार...आम्ही आमचा हक्क व अधिकार मागतोय, सोयाबीनचा एकरी ३५ हजार खर्च अन् उत्पन्न १५ हजार. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. सरकारचे धोरण शेतकरी विरोधी असल्याने सोयाबीनला ४५०० भाव मिळतो. १८ जानेवारीपर्यंत वरील मागण्या मान्य न झाल्यास १९ जानेवारीला मुंबई, गुजरातला रेल्वे जाणार नाहीत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा जीवही गेला तरीही चालेल, पण शेतकरी, शेतमजूर, निराधारांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र