शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

महावितरणला ६५ कोटींचा चुना

By admin | Published: February 17, 2016 11:51 PM

औरंगाबाद : वीजबिल भरण्यास टाळाटाळ करायची अन् आकडा खूप मोठा होऊ द्यायचा. हा आकडा वाढल्यानंतर बिल भरण्यास असमर्थता दाखवायची आणि शेवटी महावितरण कंपनीकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित होऊ द्यायचा,

औरंगाबाद : वीजबिल भरण्यास टाळाटाळ करायची अन् आकडा खूप मोठा होऊ द्यायचा. हा आकडा वाढल्यानंतर बिल भरण्यास असमर्थता दाखवायची आणि शेवटी महावितरण कंपनीकडून कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित होऊ द्यायचा, त्यानंतर तत्कालीन अभियंता, लाईनमन यांना हाताशी धरून दुसऱ्या नावाने नवीन कनेक्शन घ्यायचे, अशा प्रकारचे फंडे वापरून हजारो ग्राहकांनी महावितरण कंपनीला कोट्यवधी रुपयांचा चुना लावला आहे. बिल बुडविणाऱ्या शहरातील तब्बल ३० हजार ग्राहकांची यादी महावितरणने तयार केली आहे. त्यांच्याकडे ६५ कोटी रुपये थकले असून त्यांना कोर्टात खेचण्याची तयारी महावितरणने सुरू केली आहे.औरंगाबाद शहरातील ४९ हजार १३८ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आलेला आहे. यापैकी ३० हजार ग्राहकांनी महावितरणचे ६५ कोटी रुपये बुडविल्याची माहिती मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी दिली. ते म्हणाले की, औरंगाबाद परिमंडळामध्ये जालना औरंगाबाद शहर आणि ग्रामीण या विभागांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ग्राहक तर औरंगाबाद ग्रामीण भागातील १ लाख ११ हजार ग्राहकांनी बिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. यात ग्रामीण भागातील कृषिपंपांची संख्या अधिक आहे. यातील ८० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होऊन अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, असे असले तरी ज्या ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे, त्या जागेवर जुने बिल भरल्याशिवाय नवीन कनेक्शन देऊ नये, असा नियम आहे, असे असताना संबंधित जागेवर आज खरेच वीज आहे अथवा नाही, याबाबतची पडताळणी करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार केले जाणार आहे. एवढेच नव्हे तर वसुलीसाठीही आम्ही विशेष मोहीम राबवीत आहोत. मार्चमध्ये मोहिमेला सुरुवात होईल.