शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "महाराष्ट्रातील कायदा, सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली; सरकारने जबाबदारी स्वीकारली पाहिजे"
2
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
3
Supriya Sule : "राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
4
रामलीलामध्ये कुंभकर्णाची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा हार्ट अटॅकने मृत्यू, खाली कोसळला अन्...
5
माझ्या गावचा मुलगा, घरकुल नाही आम्ही त्याला चांगले मोठे घर बांधून देणार; अजित पवारांच्या सूरजबाबत मोठ्या घोषणा
6
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर रितेश देशमुखची संतप्त पोस्ट, म्हणाला- "गुन्हेगारांना..."
7
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
8
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
9
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
10
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
11
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
12
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
13
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
14
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
15
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
16
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
17
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
18
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
19
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 

महावितरणच्या तारांचा झोपाळा; बरेवाईट झाले तर जबाबदार कोण? 

By साहेबराव हिवराळे | Published: November 24, 2023 4:40 PM

शहरालगतच्या वसाहतीत वीज प्रवाहित वायर तुटणे, ‘झिरो’ लाईनमन डीपीजवळ जाऊन फ्यूज टाकणे किंवा खांबावर चढून वायर बदलणे असे प्रकार सुरू असतात.

छत्रपती संभाजीनगर :शहरात विविध ठिकाणी महावितरणच्या लटकणाऱ्या तारांमुळे सर्वसामान्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता वाहन बाहेर गेले आहे. आल्यावर सांगतो, असे सांगतात. तोपर्यंत रस्त्यावर जिवंत तारा लोंबकळलेल्या असतात. याकडे अधिकारी लक्ष देणार कधी, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. शहरालगतच्या वसाहतीत वीज प्रवाहित वायर तुटणे, ‘झिरो’ लाईनमन डीपीजवळ जाऊन फ्यूज टाकणे किंवा खांबावर चढून वायर बदलणे असे प्रकार सुरू असतात.

शहरात या ठिकाणी लटकलेल्या तारांचा धोकाचिकलठाणा औद्योगिक क्षेत्र चौक : विद्युत ट्रान्सफार्मरची मंजुरी व दुरुस्तीसाठी महावितरणने जबाबदारी घेऊनही सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने औद्योगिक क्षेत्रात जड वाहनावर प्रवाहित तार पडण्याची भीती आहे.राजनगर, मुकुंदनगर : वीजपुरवठा खंडित होऊन अंधाराचे साम्राज्य पसरते. अनेकदा कळवूनही लाईनमन दुरुस्तीसाठी येतच नाही. त्यामुळे अंधारात राहावे लागते.मिसारवाडी : उघड्या डीपींचे फ्यूज बॉक्स आणि नागरिकांना ये-जा करताना रस्त्यावर जाताना तुटलेल्या तारा पाहून जपूनच प्रवास करावा लागतो. दिवसा लक्षात येते; परंतु रात्री काही दुर्घटना झाल्यास दोषी कोण?

अशा तारांबाबत तक्रार कोठे कराल?विद्युत तारा तुटल्या तर जवळील फ्यूज कॉल सेंटर किंवा टोल फ्री नंबरवर कॉल करून माहिती द्यावी.

‘महावितरण’चे लक्ष नाही का?कर्मचारी वेळकाढूपणा करतात, कर्मचाऱ्यांच्या वाहनांना जीपीआरएस लावण्यात यावा, म्हणजे कर्मचाऱ्यांची तत्परता लक्षात येईल.

नागरिक काय म्हणतात? महावितरण कार्यालयास फोन केला तरी ते कुणालाही न पाठविता झिरो लाईनमनला पाठवितात. रस्ता ओलांडून वीज जोडण्या दिल्या आहेत, काही जिवावर बेतले तर जबाबदार कोण?- सुभाष पांढरे पाटील, नागरिक

विजेच्या तारा तुटल्याने धोका असतो. पण महावितरण नागरिकांना दाद देत नाही.- गणेश घोडके, नागरिक

तत्काळ वीज जोडणी..काही तक्रारी प्राप्त झाल्या की, टीम पाठविली जाते, परंतु अधिक तक्रारी असल्यास विलंब होऊ शकतो, नागरिकांनी सहकार्य करावे.- महावितरण अधिकारी

टॅग्स :mahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद