शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

'मराठवाडा कोकणासारखा झालाय, आता तरी मराठवाड्याचे फोटो टाका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 13:56 IST

मराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो

ठळक मुद्देमराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो, किंबहूना केलेच जात नाहीत

औरगाबाद - मराठवाडा म्हटलं की दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, वाळलेली रानं आणि पाण्याची, पावसाची वाट बघणारा माणूस हे चित्र डोळ्यासमोर उभा राहतं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यातही सौंदर्य फुललंय. बालाघाटच्या डोंगररांगात निसर्ग अवरतरलाय. नदी, नाले, धरणं तुंबड वाहत आहेत. त्यामुळेच, मराठवाड्यातील एका छायाचित्रकाराने महाराष्ट्र टुरिझम विभागाला प्रश्न केला आहे. 

आमच्या मराठवाड्यावर अन्याय नको, हे राजकारणातील दिग्गज नेत्यांचं वाक्य महाराष्ट्राला परिचित आहे. निधी देण्याच्या बाबतीत, योजना मंजूरीच्या बाबतीत किंवा शेतकरी प्रश्नांच्या बाबतीत नेहमीच मराठवाड्यावर अन्याय होतो, असा सूर निघतो. आता, मराठवाड्यातील छायाचित्रकार सचिन नलावडे यांनीही मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र टुरिझम विभागाच्या फेसबुक आणि ट्विटर हँडलवरुन मराठवाड्याचे फोटो शेअर करण्यात हात आखडता घेतला जातो, किंबहूना केलेच जात नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यासाठी, वारंवार ते मराठवाड्यातील निसर्ग सौंदर्याचे, ऐतिहासिक वास्तूंचे फोटो शेअर करुन महाराष्ट्र टुरिझम विभाग आणि पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना टॅग करत असतात. आजही त्यांनी फेसबुक पोस्ट करत, पावसामुळे निसर्ग सौंदर्याने नटलेला मराठवाडा दाखवा, अशी हाक या विभागाला घातली आहे. 

मराठवाड्यात अगदी कोकणासारखं वातावरण झालयं... सतत पाऊस, नद्या वाहत आहेत, ओसंडुन वाहणारे धबधबे, डोंगरद-या हिरव्यागार... आता तरी महाराष्ट्र टुरिझमच्या FB पेजने मराठवाड्यातले फोटो टाकायला काय हरकतय?, असा प्रश्न सचिन यांनी विचारला आहे. आता तरी मराठवाड्याचे फोटो टाका... असेही त्यांनी म्हटलं आहे.   

महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादचं नाव घेतलं जात. येथील अजंठा-वेरुळ लेणी, बीवी का मगबरा, दौलताबाद किल्ला आणि निजामशहा, औरंगजेब बादशहा यांच्या वास्तू संग्रहालयाचे पर्यटन करण्यासाठी विदेशातून पर्यटक येत असतात. एकीकडे पर्यटनांचा ऐतिहासिक वारसा लाभला असताना, दुसरीकडे मराठवाडा म्हणजे दुष्काळी पट्टा, पावसाची वाट बघणारा शेतकरी असंच चित्र निर्माण झालय. मात्र, या मराठवाड्यातही निसर्ग सौंदर्य आहे, ते पाहिल्यास दिसेल. तसेच, मराठवाड्याचं हे सुंदर रुप महाराष्ट्र टुरिझम विभागाने दाखवल्यास निश्चितच मराठवाड्यात आणखी पर्यटन वाढेल, अशीच भावना सचिन यांनी व्यक्त केली आहे.  

पावसामुळे रामेश्वर धबधबा ठरलाय आकर्षण 

बीड जिल्ह्यातील कपिलधार असेल, सौताड्याचा धबधबा असेल, कंकालेश्वर मंदिर असेल, बालाघाटच्या डोंगररांगा असतील, औरंगाबाद असेल, औंढा-नागनाथाचं मंदिर असेल, नुकतेच सिने अभिनेते सयाजी शिंदेनी उभारलेली देवराई वनराई असेल, यामुळे मराठवाड्याचंही निसर्ग सौंदर्य बहरंल आहे. पावसामुळे सौताड्यातील रामेश्वर धबधबाही ओसंडून वाहत आहे. तर, कपिलधारलाही सुंदर निसर्गचित्र उभा राहिलंय. 

 

टॅग्स :Marathwadaमराठवाडाtourismपर्यटनAurangabadऔरंगाबादRainपाऊस