शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

मराठवाड्याला पाणीटंचाईचे चटके; मार्चमध्येच टँकरचा आकडा ४५० पार

By विकास राऊत | Updated: March 13, 2024 12:36 IST

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात टँकरचा आकडा ४५० पार गेला आहे. विभागाला पाणीटंचाईचे चटके जाणवत असून, तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या वाढू लागली आहे. मार्चअखेर ५०० पर्यंत टँकरचा आकडा जाणे शक्य आहे. 

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर जिल्ह्यांत पाणीटंचाई जाणवत असून, परभणी, हिंगोली, नांदेड व धाराशिव हे जिल्हे अद्याप टँकरमुक्त आहेत. १५ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यातील मिळून एकूण १९७ गावे, ५८ वाड्यांना ३१९ टँकरद्वारे पाणी केला जात होता, तर सध्या लातूरसह या जिल्ह्यातील एकूण २७६ गावे, ७८ वाड्यांना ४५० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात परतूर तालुका टँकरमुक्त असून, उर्वरित तालुक्यातील एकूण १०५ गावे व ३९ वाड्यांतील ग्रामस्थांना १७८ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत आहे. भोकरदन तालुक्यात ४३ टँकर सुरू आहेत, तर जालना तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या ४०च्या घरात आहे, तर बीड तालुक्यातील गेवराई तालुक्यातील १ गाव ३ वाड्यांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एका गावात एका टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

जिल्ह्यात २६९ टँकरने पाणी...मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये २६९ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. खुलताबाद, सोयगाव हे तालुके वगळता सर्व तालुक्यांत टँकर सुरू आहेत. पैठण तालुक्यात जायकवाडी धरण असताना देखील ३५ गावे व ८ वाड्यांना सध्या ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ३८ गावे व १२ वाड्यांना मिळून ४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. फुलंब्री तालुक्यातील २० गावे व १ वाड्यांना २६, गंगापूर तालुक्यातील २० गावे व ४ वाड्यांना मिळून ५१ टँकरद्वारे तसेच वैजापूर तालुक्यातील २८ गाव व ४ वाड्यांना एकूण ३७ टँकरद्वारे, कन्नड मधील सात तहानलेल्या गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सिल्लोड तालुक्यातील २१ गावे व ७ वाड्यांना मिळून ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी जिल्ह्यांतील एकूण १६९ गावे व ३६ वाड्यांना २६९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद