शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

मराठवाड्याचा आवाज हरवला; प्रसिद्ध विधीज्ञ प्रदीप देशमुख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 18:21 IST

अॅड देशमुख हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड या गावचे. त्यांनी एल.एल.बी केल्यानंतर बॅरिस्टर गाडगीळ यांचे ज्युनियर म्हणून मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय आरंभिला.

औरंगाबाद : प्रसिद्ध विधीज्ञ प्रदीप गोविंदराव देशमुख (वय-६७,रा. सिडको एन-२) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते मराठवाडा जनता विकास परिषदेचे माजी अध्यक्ष होते व त्या माध्यमातून त्यांनी मराठवाडा विकासाचे अनेक प्रश्न लावून धरले होते. स्वतंत्र मराठवाडा राज्य स्थापन झाले पाहिजे, या मागणीचा ते सतत पुनरुच्चार करीत असत. औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. समन्यायी पाणी वाटपासाठी आणि मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांनी अनेक सार्वजनिक हित याचिका यशस्वीपणे चालविल्या. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि विधी क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत अनेकांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

अॅड देशमुख हे लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड या गावचे. त्यांनी एल.एल.बी केल्यानंतर बॅरिस्टर गाडगीळ यांचे ज्युनियर म्हणून मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय आरंभिला. बॅरिस्टर गाडगीळ लोकसभेचे सदस्य झाल्यानंतर देशमुखही दिल्लीला गेले. ते तेथेच नोकरीला लागले. औरंगाबाद येथील वकिल संघाचे एक प्रतिनिधी मंडळ औरंगाबादला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून तत्कालीन पंतप्रधानांना निवेदन देण्यात करिता गेले होते. त्यावेळी देशमुख यांच्यामुळे बॅ. गाडगीळ यांनी त्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आज सकाळी मुकुंदवाडी समशानभूमीत दिवंगत प्रदीप देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या जनहित याचिका गाजल्या प्रदीप देशमुख हे जनहित याचिका दाखल करणारे वकील म्हणून मराठवाड्यात प्रसिद्ध पावले होते. मराठवाड्याला हक्काचे गोदावरीचे पाणी मिळायला पाहिजे म्हणून बऱ्याच याचिका उच्च न्यायालयात केल्या होत्या. ते मराठवाड्याच्या पाणी प्रश्ना करिता उच्च न्यायालयात एकटे लढले. कॉंग्रेसमध्ये असताना त्यांनी राजीव गांधी मित्र मंडळाची स्थापना केली होती. पुढे त्यांनी भाजप मध्ये प्रवेश घेतला होता. एक चांगला वक्ता अशी त्यांची ख्याती होती. 

टॅग्स :Deathमृत्यूMarathwadaमराठवाडा