शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सांगता समारोह उरकण्याची घाई; नियोजन समिती कागदावरच

By विकास राऊत | Published: September 01, 2023 8:59 PM

सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमांच्या आयोजनासाठी समितीची स्थापनादेखील केली, परंतु त्या समितीला देखील विश्वासात घेतले नसल्याने समिती कागदावरच राहिली आहे.

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष संपण्यास फक्त १६ दिवस उरले आहेत. या काळात सुमारे १६ ते २० कोटी रुपयांतून आठ जिल्ह्यांत सांस्कृतिक व विविध स्पर्धांचा धुरळा उडणार आहे. पूर्ण वर्ष गेले; परंतु, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शासनपातळीवरील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी पाऊल उचलले गेले नाही. सांस्कृतिक विभागाने कार्यक्रमांच्या आयोजनासाठी समितीची स्थापनादेखील केली, परंतु त्या समितीला देखील विश्वासात घेतले नसल्याने समिती कागदावरच राहिली आहे. महोत्सवाची रूपरेषा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनीच ठरविली आहे.

प्रत्येक जिल्ह्यासाठी नियोजन समितीतून दाेन कोटी रुपये देण्याचे ठरले असून चार कोटी रुपये यापूर्वीच मंजूर झाले आहेत. चार कोटींंमधून प्रत्येक जिल्ह्याला ५० लाख याप्रमाणे मंजूर करण्यात आले आहेत. डीपीसीतून दाेन कोटी आणि शासनाचे ५० लाख असे प्रत्येक जिल्ह्याला अडीच कोटी रुपये सांस्कृतिक उपक्रमांसाठी मिळणार आहेत. लेबर कॉलनीतील १०० कोटींतून मुक्तिसंग्राम लढ्याचे स्मारक उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा मंजूर झाला आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला सुशोभीकरण व इतर प्रस्तावांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

समितीला डावलून कार्यक्रमांचे नियोजनसांस्कृतिक विभागाने २७ जून २०२३ रोजी अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी समिती स्थापन केली. त्यात १५ सदस्य आहेत. आ. अभिमन्यू पवार, डॉ. शिरीष खेडगीकर, निशिकांत भालेराव, सूर्यकांता पाटील, ॲड. आशिष वाजपेयी, राजकुमार धुरगुडे, डॉ. ऊर्मिला चाकूरकर, डॉ. रश्मी बोरीकर, गायक उदय वाईकर, ॲड. जी. आर. देशमुख, ॲड. वामनराव चटप, सुभाष जावळे, नितीन चिलवंत, दीपक ढाकणे, लक्ष्मण निकम यांचा समितीत समावेश असून यातील कुणालाही गुरुवारी निमंत्रित करण्यात आले नव्हते.

घाईघाईच्या नियोजनावर काय बोलले मुनगंटीवार?अमृतमहाेत्सवी वर्ष संपत असताना घाईघाईने कार्यक्रम घेतले जात आहे काय, यावर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, वर्षभर सर्वांना विश्वासात घेऊन अनेक कार्यक्रम घेतले आहेत. घाईघाईने कार्यक्रमाचे नियोजन नाही. निधीदेखील वेळेत दिला. तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सुशोभीकरणासाठीदेखील मनपाला निधी दिला.

विश्वासात घेणे गरजेचे होतेमुनगंटीवारांच्या उपस्थितीतील बैठकीची कल्पनाच नव्हती. मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवाची सांगता समारोह करीत असताना मराठवाड्यात जे स्वातंत्र्यसैनिक हयात आहेत किंवा त्यांची पिढी जे सध्या या विभागासाठी आस्थेने काम करीत आहेत. त्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा ठरविणे गरजेचे होते.-डॉ. रश्मी बोरीकर, सदस्य मराठवाडा अमृतमहोत्सवी वर्ष समिती

टॅग्स :Marathwadaमराठवाडाcultureसांस्कृतिक