शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

पंगतीमध्ये बसलेल्या मराठवाड्याला ओळखीचा ‘वाढपी’ मिळालाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 7:53 PM

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन विशेष: 

- डाॅ. शिरीष खेडगीकर

‘पंगतीमध्ये वाढपी ओळखीचा असेल तर जेवणाऱ्याला दोन-चार लाडू जास्त मिळतात, मराठवाड्याच्या ताटात आता विकासाचे पदार्थ पडतील’ असे मराठवाड्याचे भूमिपुत्र माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख आपल्या भाषणातून नेहमी सांगायचे; परंतु गेल्या काही वर्षांपासून विकासाच्या लाडूची वाट पाहत पंगतीमध्ये बसलेल्या मराठवाड्याला ओळखीचा ‘वाढपी’ मिळालाच नाही, अशी आज मराठवाड्यातील सर्वसामान्य जनतेची भावना झाली आहे.

संवैधानिक तरतुदीमुळे मराठवाड्याला माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कारकीर्दीत वैधानिक विकास मंडळ मिळाले. दुर्दैवाने आज त्याचा फक्त सांगाडा शिल्लक आहे. गतवर्षी १७ सप्टेंबर रोजी अमृतमहोत्सवी मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या ४६ हजार ५७९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या ‘पॅकेज’चे काय झाले? गतवर्षी घोषित केलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची सद्य:स्थिती काय आहे, याचा पाठपुरावा मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी करणे अपेक्षित आहे. ७६ वर्षांत मराठवाड्याला काय मिळाले, या प्रश्नाचे उत्तर देताना दळणवळणाच्या सुविधा, चौपदरी महामार्ग इत्यादी गोष्टींमुळे काही प्रमाणात झालेली सोय वगळता अन्य सर्व क्षेत्रांमध्ये मराठवाड्याला अजूनही खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. पूर्वी मला माझ्या गावी, अंबाजोगाईला जाण्यासाठी बसने आठ तास लागत. आता चारचाकीने मी चार तासांत तेथे जातो. तालुक्यांची गावे ‘बायपास’ झालीत; परंतु रस्त्यावर लागणाऱ्या खेड्यांमध्ये, तेथील लोकांमध्ये फारशी सुधारणा झाल्याचे दिसत नाही.

ग्रामीण शाळांची गुणवत्ता, तेथील शैक्षणिक सुविधा, खेड्या-पाड्यांमधील आरोग्यविषयक सुविधा आदींची पाहणी केल्यानंतर निराशा होते. नदीजोड प्रकल्प आणि ‘वाॅटरग्रीड’सारख्या जलसिंचनाच्या योजना केवळ कागदावरच राहिल्या. रेल्वे आणि हवाई प्रवासाच्या सुविधा वाढल्या; परंतु पर्यटन क्षेत्राचा विकास झाला नाही. औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या; परंतु आजही मराठवाड्यातील हजारो तरुण अभियंते नोकरीसाठी पुण्या-मुंबईचा किंवा विदेशाचा रस्ता गाठतात. हे स्थलांतर कधी थांबणार?

इ.स. १७२४ पासून १९४८ पर्यंत जवळजवळ सव्वादोनशे वर्षे आणि त्यानंतरही १९५६ पर्यंत हैदराबाद हीच मराठवाड्याची राजधानी होती. मराठवाड्याचा अनुशेष काढताना पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भाशी तुलना करणे आता उपयोगाचे नाही. हैदराबादचा तेथील डोळस राज्यकर्त्यांनी केलेला डोळे दिपवून टाकणारा औद्योगिक विकास मराठवाड्यातील जुन्या-जाणत्या लोकप्रतिनिधींनी डोळे उघडून एकदा पाहावा आणि पंगतीत बसलेल्या मराठवाड्याच्या ताटात विकासाचे गोडधोड वाढावे, हीच आजच्या मराठवाडा मुक्तिसंग्रामदिनी शुभेच्छांसह अपेक्षा.

(लेखक छत्रपती संभाजीनगर येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचे विश्वस्त आहेत)

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा