शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

टँकरवाड्याच्या दिशेने मराठवाडा; मार्च अखेरीस टँकर ६०० पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 17:03 IST

मराठवाड्यातील ८७७ प्रकल्पात फक्त २३ टक्के पाणी

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मार्च अखेरीस विभागातील पाच जिल्ह्यांतील ३९९ गावे आणि ९१ वाड्यांना ६०६ टँकरने पिण्याचे पाणीपुरवठा होत असून एप्रिल आणि मे महिन्यांत आणखी परिस्थिती बिकट होणार आहे.मराठवाड्याची--- छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक टँकरचा आकडा सध्या आहे. त्या खालोखाल जालना शहराचा क्रमांक आहे. या दोन जिल्ह्यांत ५६५ टँकरने पाणीपुरवठा होत असून पुढील दोन महिन्यांत १ हजारांपर्यंत टँकरचा आकडा जाईल अशी गंभीर परिस्थिती आहे.

विभागात २०२३ साली पाऊस समाधानकारक झाला नाही. १५ टक्के पावसाची तूट राहिली. परिणामी मोठ्या, मध्यम व लघु प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा साठा कमी प्रमाणात झाला. विभागात सध्या फक्त २३.६९ टक्के पाणीसाठा आहे. मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात २३ टक्के पाणीसाठा सध्या आहे. मागीलवर्षी ५० टक्के पाणी धरणात होते. टँकरसाठी ३३२ तर त्याव्यतिरिक्त ५७० अशा ९०२ विहिरींचे अधिग्रहण प्रशासनाने केले आहे.

३९९ गावे, ९१ वाड्या तहानल्यामराठवाड्यातील ४०० गावे आणि ९१ वाड्या तहानल्या आहेत. यात छत्रपती संभाजीनगरमध्ये २३० गावे ४२ वाड्या, जालन्यात १३५ गावे, ४८ वाड्या, बीडमध्ये १६ गावे, लातूरमध्ये १ तर धाराशिव जिल्ह्यात १८ गावे तहानली आहेत.

टंचाई आराखड्यासाठी नियोजनविभागातील मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांसाठी टंचाई आराखड्याचे नियाेजन करण्यात आले आहे. पहिल्या तीन महिन्यांचे नियोजन अंतिम टप्प्यात असून जून अखेरपर्यंत टंचाईचे नियोजन करण्यासाठी २०० कोटींहून अधिकची मागणी प्रशासन करण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात २३ टक्के पाणीमोठे प्रकल्प ...११ ..... २९.०५मध्यम प्रकल्प... ७६ .....१२.४३लघु प्रकल्प.... ७४९........१२.९२गोदावरीवरील बांधारे... १५ .....२६.८३तेरणा, मांजरा नदीवरील बंधारे ....२७..... १७.६९एकूण प्रकल्प..... ८७७...... २३.६९

कोणत्या जिल्ह्यात किती टँकरजिल्हा....................टँकरछत्रपती संभाजीनगर...३४८जालना...२१७बीड...११लातूर....१धाराशिव....२९एकूण....६०६

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद