शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

विधी विभागातून जमिनीच्या मावेजाच्या संचिकेला फुटले पाय; सहा वर्षांपासून शेतकऱ्याचे हेलपाटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 16:04 IST

विधी विभागावर शेतकऱ्याने ओढले ताशेरे

छत्रपती संभाजीनगर : सोलापूर-धुळे महामार्गात जमिनीचे संपादन झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मावेजा मिळाला. मात्र भूसंपादन होताना जमीन यलो झाली असल्यामुळे त्या दराने भाव मिळावा, यासाठी सहा वर्षांपासून शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारीत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी संचिका तपासणीसाठी विधी विभागाकडे पाठविलेली असताना तेथून संचिका गायब झाल्याचा आरोप करीत जमीन मालक ताराचंद भाटी यांनी गुरुवारी केला. विधी विभाग मुजोरीने वागत असून शेतकऱ्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचा आरोप करीत भाटी व इतर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अकांडतांडव केले. भाटी यांची पंढरपूरमध्ये गट क्र. १७ मध्ये ५ एकर ९ गुंठे जमीन आहे. त्यातील ८४ गुंठे जमिनीचे २०१५ एनए केली. त्यातील महामार्गात ३६ गुंठे जमीन गेली. एनए जमिनीचा मोबदला वेगळा आहे. ग्रीन जमिनीसाठी मोबदल्याचे दर वेगळे आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात ग्रीन वर्गची जमीन म्हणून मोबदला जागा मालकांनी घेतला. परंतु यलो जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी सहा वर्षांपासून पाठपुरावा सुरू असूनही त्यात काहीही न्याय मिळालेला नाही.

१० वर्षांपासून एकच विधी सल्लागारजिल्हाधिकारी कार्यालयातील विधी सल्लागार हे पद कंत्राटी आहे. परंतु १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून उषा वायाळ या त्या पदावर आहेत. प्रशासनातील इतर कंत्राटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना ११ महिने झाले की, त्यांचा कार्यकाळ संपतो. मग एवढ्या वर्षांपासून एकच विधी सल्लागार प्रशासनाने का बदलला नाही. कंत्राटी भरतीची प्रक्रिया का राबविली नाही. ही सगळी मिलीभगत असल्याचा आरोप भाजपाचे सरचिटणीस संंजय केणेकर यांनी केला. यावेळी शेतकऱ्यांनी विधी विभागाकडून छळ होत असल्याचा आरोप केला.

संचिका कुठेही गेलेली नाहीसंचिका कुठेही गेलेली नाही. त्यांची संचिका जिल्हाधिकाऱ्यांकडून आली. ती लवाद शाखेकडे गेली. मी आज रजेवर होते. इतर शाखेतील कर्मचारी बाहेर गेलेले होते. त्यांना संचिका शोधून दिली आहे. संचिकेवर स्टम्पिंग झालेले नाही, तशीच संचिका ते घेऊन गेले.-उषा वायाळ, विधी सल्लागार

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद