शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

छत्रपती संभाजीनगरात मध्यरात्रीचा रिक्षा प्रवास ‘डेंजर’; जास्तीची भाडेवसुली, असुरक्षिततेची भावना

By संतोष हिरेमठ | Published: September 13, 2024 2:01 PM

‘ऑन द स्पाॅट’ @ रेल्वे स्टेशन : अव्वाच्या सव्वा भाडेवसुली, रेल्वेने बाहेरगावहून येणाऱ्या महिलांना नेण्यासाठी येतात स्वत: नातेवाईक, रिक्षावर भरवसा नाहीच

छत्रपती संभाजीनगर : मध्यरात्रीनंतर रेल्वे स्टेशनवरून रिक्षाचा प्रवास करणे प्रवाशांसाठी काहीसे ‘डेंजर’च ठरत आहे. कारण रात्री १२ वाजेनंतरचे भाडे ऐकून काही क्षणांसाठी प्रवाशांचे डोळे पांढरे होण्याचीच वेळ येते. मनाला वाटेल ते भाडे रिक्षाचालकांकडून सांगितले जाते. शिवाय रात्री उशिरा रेल्वेने बाहेरगावहून येणाऱ्या महिलांना नेण्यासाठी नातेवाईक दुचाकी, चार चाकी घेऊन स्वत: येत असून, रिक्षावर भरवसा उरला नसल्याची परिस्थिती आहे.

रिक्षाचालकांच्या बेशिस्तीचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. रेल्वे स्टेशनवर सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ असते आणि याच ठिकाणी अनेक रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना बसतो. रात्रीच्या वेळी ही मनमानी अधिक वाढते. याच पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने बुधवारी मध्यरात्री रेल्वे स्टेशन गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. मध्यरात्रीनंतर रिक्षाचालकांची चालणारी मनमानी, अरेरावी कारभार पाहायला मिळाला. त्याच वेळी काही रिक्षाचालक प्रामाणिकपणे प्रवासी नेत असल्याचे दिसून आले. पोलिसांचे वाहन गस्तीसाठी काही वेळासाठी येत असल्याचेही दिसून आले.

रात्री १२:३० वाजेपर्यंत सिटर; नंतर बंदरेल्वे स्टेशनवरून रात्री १२:३० वाजेपर्यंत सिटर रिक्षा धावतात. त्यासाठी प्रतिसिटप्रमाणे आकारण्यात येणारे भाडे दिवसा एक आणि रात्री अधिक पाहायला मिळाले. सिडको बस स्थानकासाठी दिवसा ३० रुपये, तर रात्री १२:३० वाजेपर्यंत ५० रुपये आकारण्यात येत होते.

बसून राहा.. अन्य प्रवासी मिळेपर्यंतएक प्रवासी मिळाल्यानंतर त्याला रिक्षात बसवून ठेवण्यात येते. त्यानंतर रिक्षाचालक दुसऱ्या प्रवाशाच्या शोधात जातो. थेट रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जाऊन प्रवासी आणले जातात. किमान ४ ते ५ प्रवासी मिळाल्याशिवाय रिक्षा जागेवरून हलत नाही.

सिडको बस स्थानकाचे भाडे २०० रुपयेरात्री १ वाजेनंतर रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे मागतात. सिडको बस स्थानकाला जाण्यासाठी रात्री १ वाजेनंतर एका रिक्षाचालकाला भाडे विचारण्यात आले. तेव्हा त्याने त्यासाठी २०० रुपये सांगितले. इतर रिक्षाचालकांना भाडे विचारले असता, २०० रुपयेच सांगण्यात आले. छावणीसाठी १५० रुपये, क्रांती चौकासाठी १५० रुपये, सातारा खंडोबा मंदिरासाठी ३०० रुपये भाडे सांगण्यात आले.

नातेवाईक येईपर्यंत महिलांची धडधडरेल्वे स्टेशनवरून रात्री रिक्षाने घरी जाणे महिला टाळत असल्याचे दिसून आले. महिला प्रवाशांना रिक्षाचालक ‘कुठे जायचे?’ अशी विचारणा करीत होते. ‘नातेवाईक येत आहेत,’ असे सांगून महिला रिक्षाचालकांना नकार देत होत्या. दुचाकी, चार चाकी घेऊन नातेवाईक येत होते. तसेच दुचाकी घेऊन नातेवाईक आल्यानंतर अधिक सामान असल्याने काही महिला रिक्षात बसून जात होत्या. दुचाकीधारक नातेवाईक रिक्षाच्या पाठीमागे जात होते.

रात्रीच्या वेळी तपासणी मोहीम घेऊरात्रीच्या वेळी रिक्षाचालकांची तपासणी मोहीम हाती घेतली जाईल. अधिक भाडे आकारणी, मीटरने येण्यास नकार दिल्याप्रकरणी प्रवाशांनी संबंधित रिक्षाच्या नंबरसह तक्रार करावी. अशांवर कारवाई केली जाईल.- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी

रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावेमीटरचे दर मागणीप्रमाणे मिळाले नाही त्यामुळे अनेक रिक्षाचालक मीटरने जाण्यास नकार देतात. रात्रीच्या वेळी दीडपट भाडे घेता येते. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे. रेल्वे स्टेशनवर प्रिपेड रिक्षा सुरू करावी. त्याचा फायदा प्रवाशांना होईल.- निसार अहमद खान, अध्यक्ष, रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRailway Passengerरेल्वे प्रवासीauto rickshawऑटो रिक्षाCrime Newsगुन्हेगारी