शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

एमआयएमचा मार्ग स्वतंत्र!

By admin | Published: November 16, 2014 12:09 AM

औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- ए- मुस्लिमीन (एमआयएम) आणि भारतीय जनता पार्टी राजकारणातील दोन वेगवेगळी टोके आहेत. ती एकत्र कधीच येऊ शकत नाहीत.

औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- ए- मुस्लिमीन (एमआयएम) आणि भारतीय जनता पार्टी राजकारणातील दोन वेगवेगळी टोके आहेत. ती एकत्र कधीच येऊ शकत नाहीत. महाराष्ट्र विधानसभेत आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, देणारही नाही. आमचा मार्ग वेगळा असल्याचे प्रतिपादन खा. असदोद्दीन ओवेसी यांनी केले.आमखास मैदानावर भर पावसात आयोजित सभेस आ. इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी, माजी मंत्री गंगाधर गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, भाजपाने महाराष्ट्र विधानसभेत ज्या पद्धतीने विश्वासमत पारित केले ते खूपच हास्यास्पद होते. आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही. काँग्रेसने तेलंगणच्या मुद्यावर काय केले. मोक्का कायदा त्यांनीच पारित केला. राष्ट्रवादीचे नेते आता मोदींच्या सुरात सूर मिळवीत आहेत. हे सर्व राजकारण अत्यंत खालच्या पातळीवरचे असल्याचे त्यांनी आपल्या शैलीत नमूद केले.वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्या धनाढ्य मंडळींनी बळकावल्या आहेत, त्या परत घेण्यात येतील. त्यासाठी पक्षाचे आमदार विधानसभेत आवाज बुलंद करतील. वेरूळ येथे शस्त्रसाठा पकडल्यानंतर ज्या निष्पाप तरुणांना नऊ वर्षांपासून तुरुंगात ठेवण्यात आले, त्यांचा निकाल लवकरात लवकर लावावा. एटीएसने औरंगाबादच्या नईमला कोठे ठेवले, या सर्व प्रश्नांची उत्तरे विधानसभेत सरकारला विचारण्यात येतील. औरंगाबाद शहराला पुन्हा ऐतिहासिक दर्जा मिळवून देण्यात येईल, असेही ओवेसी यांनी सांगितले. तत्पूर्वी, आ. इम्तियाज जलील यांचे भाषण झाले. या जाहीर सभेत काही अपक्ष, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रवेश केला. आज सकाळी खा. ओवेसी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी आ. इम्तियाज जलील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.