शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
4
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
5
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
6
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
7
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
8
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
9
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
10
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
11
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
12
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
13
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
14
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
15
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
16
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
17
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
18
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
19
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
20
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...

मराठवाडा पाणी प्रश्नावर आमदार संजय शिरसाट यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

By बापू सोळुंके | Published: November 05, 2023 7:54 PM

 पाणी सोडण्यासाठी दरवेळी बैठकांची काय गरज

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळू नये,  यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील  काही राजकीय  पुढारी जाणुनबूजन प्रयत्न करीत आहेत. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतो, यामुळे सरकारने आमचा अंत पाहु नये, तात्काळ जायकवाडीच्या उर्ध्वभागातील धरणातून पाणी सोडावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल,अशा इशारा सत्ताधारी शिवसेना पक्षाचे प्रवक्ता तथा छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला.  आ.शिरसाट यांनी त्यांचे हे आंदोलन सरकारविरोधात नसून नगर, नाशिक जिल्ह्यातील मराठवाडा द्वेषी पुढाऱ्यांविरोधात असल्याचे स्पष्ट केले.

आ. शिरसाट म्हणाले की, मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, असा उच्च न्यायालयाचा निकाल आहे. असे असताना मराठवाड्याला पाणी मिळू नये,असे वाटणारे पश्चिम महाराष्ट्रातील काही राजकीय पुढारी  जाणूनबुजून  प्रयत्न करीत असल्याचे दिसते. आज जायकवाडी प्रकल्पात केवळ  ४५ टक्केच पाणीसाठा आहे. दोन महिन्यात हा साठा तळाला जाईल यानंतर  येणारा उन्हाळा मराठवाड्याचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही हक्काचे पाणी द्या, अशी विनंती सरकारला करीत आहोत. मराठवाड्याला पाणी देण्यात येऊ नये, यासाठी काही जण कोर्टात गेल्याचे समजल्याने  आम्हीही सोमवारी कॅव्हेट दाखल करणार आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत पाणी प्रश्नावर बोलणे झाले. त्यांनी हक्काचे पाणी मिळेल असे सांगितले. पण दरवर्षी पाणी प्रश्नासाठी मराठवाड्याला भीक का मागावी लागते, हा आमचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आता मराठवाड्यातील सर्वपक्षीय  आमदार, खासदारांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून  रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. कोकणात वाहुन जाणारे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात दोन धरणे बांधली जात असल्याचे तेथील नेते सांगतात.मात्र ही दोन धरणे बांधूच नाही,अशी आमची भूमिका असल्याचे आ. शिरसाट यांनी स्पष्ट सांगितले. पाणी सोडण्यासाठी दरवेळी बैठकांची काय गरजमराठवाड्यात दरवर्षी होणाऱ्या १८ ते २० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागचे पाणी हेच मूळ कारण आहे. यामुळे  सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की, पाणी प्रश्नावर अंत पाहु नका, अन्यथा आमही सर्वजण रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.  पाणी सोडण्यासाठी दरवेळी बैठक घेण्याची गरज काय,असा सवाल करीत बैठकीच्या नावावर पाणी उशीरा कसे सोडता येतील असा प्रयत्न केला जात असल्याचा आराेपही त्यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांवर केला. 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Shirsatसंजय शिरसाट