शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

कृषी मंत्री सत्तारांच्या कृषीमहोत्सवाला आमदार शिरसाटांची दांडी

By बापू सोळुंके | Published: January 01, 2023 10:30 PM

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे  मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उदघाटन समारंभ आयोजित केला होता.

औरंगाबाद:  

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे  मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उदघाटन समारंभ आयोजित केला होता. या समारंभाला शिंदे गटातील औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी  दांडी मारल्याने शिरसाट आणि कृषी मंत्री सत्तार यांच्यात धुसफूस सुरू असल्याची चर्चा सुरू झाली. 

शेतकऱ्यांबद्दल ज्यांना आस्था आहे ते सर्व आमदार कार्यक्रमाला उपस्थित होते असे  विधान सत्तार यांनी केले.यामुळे मंत्रीपद न मिळालेला स्वपक्षातील नेता आपल्याविरोधात कट करीत असल्याचे सत्तार यांच्या विधानाचा रोख आमदार सिरसाट यांच्या दिशेने होता,असे बोलले जात आहे.  शिरसाट यांच्यासोबत आपले अथवा त्यांचे आपल्यासोबत कोणतेही मतभेद नसल्याची सारवासारवही त्यांनी केली. 

शिवसेनेतील बंडाच्या वेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. यामध्ये अग्रभागी होते ते औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट. आ. संजय शिरसाट यांना मंत्री केले जाईल,  याबाबत  शेवटच्या क्षणापर्यंत चर्चा होती.  मात्र ऐनवेळी  यादीतून त्यांचे नाव कापून सिल्लोडचे  आमदार  अब्दुल सत्तार  यांना मंत्री करण्यात  आले.  सत्तार यांना मंत्रीपद  मिळू नये,  यासाठी नेमके त्याच वेळी  त्यांच्या टीईटी घोटाळ्यातील यादीत त्यांच्या  मुलांची  नावे असल्याचे प्रकरण समोर आले होते. नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान गायरान जमीन वाटप कथित घोटाळा, तसेच सिल्लोड येथील कृषी महोत्सवासाठी पावती पुस्तक छापल्याचे प्रकरण समोर आणून सत्तार यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधी पक्षाने केली होती. यापार्श्वभूमीवर शनिवारी त्यांनी एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना  मंत्रीपद मिळाले नाही,असा स्वपक्षातील नेता माझ्याविरोधात कट करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर शिंदेगटातील आमदारांमध्ये मंत्रीपदावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चेला सुरवात झाली. यादरम्यान  सत्तार यांनी आयोजित कृषी महोत्सावचे उदघाटन रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती  सिल्लोड येथे झाले. या उदघाटनासाठी आमदार संजय शिरसाट यांनी दांडी मारली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती झालेल्या या कार्यक्रमासाठी शिंदे गटातील आ. शिरसाट वगळता अन्य सर्व आमदार हजर होते. विषयी बोलताना सत्तार यांनी ज्यांना शेतकऱ्यांबद्दल प्रेम होते ते सर्व आमदार आले असे खोचक विधान केले. यावरून सत्तार यांचा कालचा बोलण्याचा रोख  शिरससाट यांच्या दिशेने होता, असे बोलले जात आहे.  शिरसाट यांना दुसरे महत्वाचे काम असेल यामुळे ते आले नसावे,असे नमूद करीत  आपले शिरसाट यांचे आपल्याबद्दल आणि माझे त्यांच्या बद्दल कोणतेही मतभेद नसल्याची सारवासारव कृषीमंत्र्यांनी केली.