शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
3
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
4
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
5
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
6
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
7
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
8
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
9
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
10
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
11
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
13
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
14
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
15
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
16
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
17
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
18
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
19
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
20
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."

बेरोजगार अभियंत्यांच्या आरक्षणात फेरफार

By admin | Published: January 17, 2016 11:44 PM

विजय सरवदे, औरंगाबाद शासन निर्णय धाब्यावर बसवत जिल्हा परिषदेत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित असलेली कामे ‘आयटीआय’धारक गुत्तेदारांना दिली जात आहेत.

विजय सरवदे, औरंगाबादशासन निर्णय धाब्यावर बसवत जिल्हा परिषदेत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित असलेली कामे ‘आयटीआय’धारक गुत्तेदारांना दिली जात आहेत. कामवाटप संनियंत्रण समितीतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी कामे वाटपाच्या आरक्षणात फेरफार करीत लाखो रुपयांची ‘माया’ कमाविण्याचा गोरखधंदाच सुरू केला आहे.यासंदर्भात ‘लोकमत’च्या हाती अनेक दस्तावेज आले आहेत. शासन निर्णयानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ३३ टक्के, मजूर सहकारी संस्थांना ३३ टक्के व नोंदणीकृत शासनमान्य गुत्तेदारांना ३४ टक्के या पद्धतीने कामांचे वाटप झाले पाहिजे. नियमानुसार कामवाटप संनियंत्रण समितीच्या अधिकाऱ्यांना सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी असलेल्या कामांच्या आरक्षणात कोणताही हस्तक्षेप किंवा फेरबदल करण्याचा अधिकार नाही. विशेष म्हणजे, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना निविदा न मागवता तसेच विनास्पर्धा कामे वाटप करण्याविषयी शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत; परंतु अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेतील कामवाटप संनियंत्रण समितीने शासन निर्णयालाच केराची टोपली दाखविली आहे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये गुत्तेदारीसंबंधी नोंदणी करावी लागते. या कार्यालयाने त्यांना ‘वर्ग-५ अ’चे नोंदणी प्रमाणपत्र दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना ‘वर्ग-५ अ’नुसार नोंदणी करावी लागते. या बेरोजगार अभियंत्यांना प्रथम नोंदणी वर्ग-५ प्रमाणे ५० लाख रुपयांची कामे देण्याचा निर्णय तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. या अभियंत्यांची रजिस्ट्रेशनची मुदत दहा वर्षांची आहे.बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांना सोडत पद्धतीने विनास्पर्धा कामे दिली जातात. पूर्वी ही मर्यादा ६० लाख रुपयांची होती. ती आता ७५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्याचा शासन निर्णय आहे. दरम्यान, ‘आयटीआय स्थापत्य अभियांत्रिकी सहायक’ ही पदविका धारण करणाऱ्या उमेदवारांना ‘वर्ग- ७’नुसार कामे देण्याचा निर्णय आहे; पण त्यांना २ लाख रुपयांचीच मर्यादा आहे. असे असताना जिल्हा परिषद कामवाटप संनियंत्रण समितीने जि.प.मधील काही पदाधिकारी व सदस्यांच्या सल्ल्यानुसार ‘आयटीआय’धारक गुत्तेदारांना सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी आरक्षित असलेल्या ‘वर्ग-५ अ’च्या कोट्यातील कामांचे नियमबाह्य वाटप करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कामे वाटपाची ही फेरफार जिल्हा परिषदेत राजरोसपणे सुरू आहे. अनेक ‘आयटीआय’धारक गुत्तेदार हे केवळ काम मिळविण्यापुरतेच कागदावर आहेत. मिळालेली कामे मात्र जि.प. पदाधिकारी किंवा सदस्य हेच करतात आणि लाखो रुपयांची बिले उचलतात. नियमबाह्य कामांचे वाटप करणे आणि त्या कामांची बिले उचलण्याच्या प्रक्रियेत जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांचे मोठे रॅकेटच कार्यरत आहे, हे विशेष!