शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

एसआयटी पथकात आणखी १२ कर्मचाऱ्यांची भर

By admin | Published: November 22, 2015 11:24 PM

शिरीष शिंदे , बीड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १४१ कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष तपासणी पथकाची स्थापना यापुर्वीच करण्यात आली आहे

शिरीष शिंदे , बीडयेथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या १४१ कोटी रूपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विशेष तपासणी पथकाची स्थापना यापुर्वीच करण्यात आली आहे. या घोटाळ्याच्या तपासाचा वेग वाढविण्यासाठी तसेच पारदर्शकात आणण्याच्या उद्देशाने पथकातील एक उपविभागीय अधिकारी व आठ कर्मचाऱ्यांच्या ताफर्यात आणखी सात अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासाच्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षका विश्वास नांगरे पाटील यांनी तीन बैठका घेतल्या आहेत. विशेष पथकामध्ये पुर्वी अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी नीलेश मोरे व इतर आठ पीय व एपीआयचा समावेश होता. आता नवीन १२ कर्मचाऱ्यांमध्ये माजलगाव येथील सहायक पोलीस अधीक्षक डॉ. हरी बालाजी यांच्यासह धारुर ठाण्याचे पोनि धरमसिंग चव्हाण, नेकनुर ठाण्याचे बाबासाहेब भुसारे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. पोनि चव्हाण यांचे शिक्षण कॉमर्स विषया झाले असल्याने त्यांची निवड झाली असल्याचे समजते. दरम्यान,बीड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १४१ कोटी रूपयांचा घोटाळा झाला होता.या प्रकरणाच्या तपासामध्ये प्रगती नाही, असा ठपका ठेवत हे प्रकरण विशेष तपासणी पथकामार्फत तपासावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र बोर्डे व न्या. पी. आर. बोरा यांनी दिले होते. त्यानंतर विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांना पत्र पाठवून पथक तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.रविवारी झाली बैठकअंबाजोगाई येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात डीसीसी घोटाळ्यासंदर्भात बैठक रविवारी पार पडली. यावेळी पथकातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी तपास झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आले. ५० लाख रूपयांपर्यंतचा तपास एपीआय, १ कोटी रूपयापर्यंतचा तपास पीआय तर पाच कोटी रूपयापर्यंतचा तपास डीवायएसपी करणार आहेत.डीसीसीच्या १४१ कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी १३१ गुन्हे दाखल झाल्याची माहिती सहायक सरकारी वकील सुजीत कार्लेकर यांनी उच्च न्यायालयाला दिली होती. आता पर्यंत या पैकी काही बहुतांश गुन्ह्यांचा तपास पुर्ण झाला असून सात गुन्हे पथकाच्या तपासावर आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आता पर्यंत ज्या प्रकरणांचा तपास पुर्ण झालेला आहे त्यांची पडताळी केली जाणार आहे. त्यानंरत उच्च न्यायालयास संपुर्ण गुन्ह्यांचे दोषारोप पत्र सादर केले जाणार आहेत.४दरम्यान, बीड जिल्ह्यातील सादोळा येथील सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य हरिभाऊ सोळंके यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. गुन्हे नोंदविलेल्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपपत्र दाखल करण्याची विनंती सोळंके यांनी याचिकेत केली होती.