शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

राज्यात सर्वात महाग रिक्षाचे भाडे औरंगाबादेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:15 AM

सर्वात महाग रिक्षा औरंगाबादेत असल्याची प्रचीती आता बाहेरगावहून येणा-या प्रवाशांना येऊ लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील अनेक मोठ्या आणि लहान शहरांमध्ये रिक्षाची सेवा आहे. सर्वात महाग रिक्षा औरंगाबादेत असल्याची प्रचीती आता बाहेरगावहून येणा-या प्रवाशांना येऊ लागली आहे. शहरातील ९० टक्के रिक्षाचालक मीटरने भाडे आकारतच नाहीत. प्रत्येक प्रवाशाकडून ठरवूनच भाडे वसूल करतात. रिक्षाचालकांकडून अवाच्या सव्वा भाडे वसूल करण्यात येत असतानाही आरटीओ कोणतीच कारवाई करायला तयार नाही.ऐतिहासिक औरंगाबाद शहर कधीकाळी टांग्यांचे शहर म्हणून ओळखले जायचे. आता ही ओळख पुसली जाऊन आता हे रिक्षांचे शहर बनले आहे. त्यातही बेकायदा रिक्षांचे, मीटर नसलेल्या रिक्षांचे, बेशिस्त रिक्षाचालकांचे शहर म्हणून या औद्योगिकनगरीला दूषणे दिली जात आहेत.शहराच्या मुख्य अथवा सिडको बसस्थानकावर पाहुणा उतरला की, रिक्षाचालकाच्या रूपाने त्याला ऐतिहासिकनगरीच्या संस्कृतीची ओळख होते. किंबहुना गाडी बसस्थानकात शिरतानाच प्रवेशद्वारात अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या रिक्षा पाहून हे शहर किती सुसंस्कृत आहे याचा अंदाज पाहुण्यांना येतो.शहरात आजमितीला २२ हजार रिक्षा आहेत; पण त्यातील निम्म्या बेकायदा आहेत! शहरात व्यवसाय करण्याचा अधिकृत परवानाच त्यांच्याकडे नाही. आरटीओ, वाहतूक नियंत्रक पोलीस, महापालिका या सगळ्यांचे नियम धाब्यावर बसवत या रिक्षा शहरात फिरून व्यवसाय करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली तरी ती जुजबी असते. काही होत नाही म्हणून रिक्षाचालकांची दादागिरी हळूहळू वाढू लागली आहे.नियमातून पळवाटा काढत, संबंधितांना त्यांचा ‘वाटा’ देत आपली वाट मोकळी करीत आहेत. रस्त्यात पडलेले खड्डे, अरुंद झालेल्या गल्लीबोळा, बंद पडलेले सिग्नल, अकार्यक्षम ट्रॅफिक पोलीस यामुळे सर्वसामान्य औरंगाबादकर अलीकडे बरेच वैतागले आहेत. एसटी महामंडळाची शहर बससेवा अत्यंत तोकडी असल्याने औरंगाबादकरांना रिक्षाशिवाय पर्याय नाही; पण याचा गैरफायदा रिक्षाचालक घेत असल्याने नागरिकांपुढील समस्या आणखी वाढल्या आहेत.